शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शेतकºयांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:17 PM

परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : यवतमाळची घटना दुर्देवी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला. त्यानंतर शासन आणि प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य कळले. यानंतर त्यांनी कीटकनाशक फवारणी करताना कुठली काळजी घ्यायची यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली. मात्र हेच आधी केले असते तर शेतकºयांचा जीव गेला नसता. हे शासन आणि प्रशासनाचे नाकर्तेपण असल्याची टीका सिनेअभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी रविवारी येथे केली.गोंदिया येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळ येथील घटनेकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने बघितले नाही. जी काळजी प्रशासन आता घेत आहे, ती आधीच घेतली असती तर शेतकºयांच्या कुटुंबांवर हे संकट ओढवले नसते. कीटकनाशक फवारणीमुळे २० ते २५ शेतकºयांचा जीव गेल्यानंतर जर प्रशासनाला जाग येत असेल तर हे दुर्देवच म्हणावे लागेल. आधीच या जिल्ह्यातील शेतकरी सततची नापिकी आणि कर्जामुळे हताश आहेत. त्यातच पिकांवरील कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी केल्याने जीव गमवावा लागत आहे. हे दोन्ही चित्र फार दुर्देवी आहे. प्रशासनाने या घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखून उपाय योजना करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शेतकरी आत्महत्यालागवड खर्चाच्या तुलनेत अद्यापही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकºयांवरील कर्जात सातत्याने वाढ होते. त्यातच बाजारपेठेतील दलालांकडून शेतकºयांचे आर्थिक शोषण केले जात आहे. जोपर्यंत या सर्व गोष्टींचे चित्र बदलणार नाही. तोपर्यंत शेतकरी समृद्ध आणि सुखी होणार आहे. शेतकरी विरोधी धोरणे आणि धारणेमुळेच शेतकºयांची आज ही स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत असल्याचा आरोप अनासपुरे यांनी केला.