शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पावसाळ्यापर्यंत पाण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:29 AM

येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे.

ठळक मुद्देडांगोरलीत आले पाणी : तरीही शहरात एक वेळ पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. मात्र पाण्याचा जपूनच वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून शहरात एकच वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे.शहराला डांगोरली येथून पाण्याचा पुरवठा होत असून वैनगंगा नदीत पाण्याचा साठाच नसल्याने पुजारीटोला प्रकल्पातून गोंदिया शहरासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अंभोरा जवळ कालवा फुटल्याने बाघ प्रकल्प विभागाने पुन्हा १५ तारखेला सकाळी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले. सोडलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत बुधवारी (दि.१८) रात्री १२ वाजतादरम्यान पोहचले. ९० किमी अंतर पार करायला चार दिवस लागले. विशेष म्हणजे, या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस पडला होता. त्यामुळे जास्त पाणी नदी नाल्यांनी सोखले नाही. अन्यथा आणखी एक दिवस पाण्याला डांगोरली पर्यंत पोहचण्यासाठी लागला असता.पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत १५ दिवसांसाठी संग्रहीत करण्याचे आदेश आहेत. सिंचन विभागाला पाणी बंद करण्याची सूचना तीन दिवसांपूर्वीच द्यायची आहे. अशात जर पुन्हा शहरासाठी पाणी हवे असल्यास त्याबाबतही तीन दिवसांपूर्वी सूचना द्यावी लागणार आहे. सध्या पाण्याची व्यवस्था झाली आहे, मात्र पाण्याचा अपव्यय होवू नये या दृष्टीने शहरात एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.विशेष म्हणजे, पुजारीटोला प्रकल्पातील पाणी नदीत येण्या पुर्वी फक्त चार-पाच दिवस एक वेळ पाणी पुरवठा करता आला असता एवढेच पाणी नदीत होते. शिवाय यावर्षी पहिल्यांदाच नदीच्या आता बनलेल्या इनवेलचे गेट तोडून पाणी पुरवठा करण्याची नौबत आली असल्याचे मजिप्राचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी सांगीतले. मात्र सध्या नदीत १० सेमी. वाढले असल्याचेही त्यांनी सांगीतले.पडली असती १४७ जेसीबींची गरजनदीतील पाणी संपल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ५ एप्रिल रोजी डांगोरली जवळील वैनगंगा नदीचे निरीक्षण केले. याप्रसंगी त्यांनी पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी नदीत संग्रहीत करण्यासाठी तलावासारखा लांब व एक फुट खोल खड्डा तयार करण्याची सूचना दिली होती. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला असता या कामासाठी सुमारे १४७ जेसीबी लागणार होते. शिवाय पुजारीटोलाचे पाणी नदीत येण्यापुर्वी ही व्यवस्था करणे गरजेचे होते. अशात हा प्रस्ताव बाजूला ठेवावा लागल्याचे शाखा अभियंता ए.वी.बागडे यांनी सांगीतले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई