शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आठ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:22 PM

बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.

ठळक मुद्देबिरसी विमानतळ : नागरिकात भीती व रोष

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.गेल्या आठ वर्षापासून बिरसी विमानतळामध्ये गावातील काही लोकांचे घर अधिग्रहीत झाले असता त्यांना शासनाच्यावतीने पुर्नवसन पॅकेज जाहीर करून याची यादी गेल्या सहा महिन्यांपुर्वीच बिरसी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली होती. पण अद्याप जागा व रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाली नाही. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. बिरसी विमानतळाने नवीन बांधकामावर बंदी लावल्याने येथील नागरिक गेल्या आठ वर्षापासून जीर्ण झालेल्या घरांतच दिवस काढत आहेत.जुने घर पाडू शकत नाही व नवे घर बांधू शकत नाही अशी त्यांची फसगत झाली आहे. त्यामुळे त्यांना जीर्ण झालेल्या घरांमध्येच राहावे लागत आहेत. गावकऱ्याच्यांवतीने वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात कळविले असता शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आम्ही मृत्यूशय्येवर पडणार तेव्हा प्रशासन जागे होणार काय? अशी ओरड आहे.सन २०१६ मध्ये मे महिन्यात आलेल्या चक्रीवादळात अनेक लोकांच्या घरावरील कवेलू व टिनाचे छत उडून गेले. एवढेच नव्हे तर गेल्या ४ जून रोजी आलेल्या वादळीवारा व पावसामुळे बिरसी येथील १० ते १५ घरांचे पुन्हा छत उडून गेले. अशा परिस्थितीत त्यांना पक्क्या घरांची आवश्यकता असूनही गेल्या आठ वर्षांपासून जीर्ण घरांमध्येच रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असून त्वरित जागा देऊन पुनर्वसनाची मागणी केली आहे. यादरम्यान जिवीत हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही येथील नागरिक करीत आहेत.