शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्ह्यात ७९१ ठिकाणी मतदार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:20 PM

येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती : प्रात्यक्षिक व नागरिकांच्या शंकांचे निरसन

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.ईव्हीएम मशीन हॅक करून एका विशिष्ट पक्षालाच सर्व मते पडत असल्याचे चांगलेच आरोप करण्यात आले आहेत. यातूनच राजकीय पक्षांत ईव्हीएम मशीनला घेऊन चांगलीत जुंपलीही आहे. ईव्हीएम मशीनला घेऊन नागरिकांच्या मनात असलेली ही शंका दूर व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या जोडीला व्हीव्हीपॅट मशीन आणले आहे. ईव्हीएम मशीनचे बटन दाबून मतदान केल्यानंतर आपण बटन दाबलेल्या पक्षालाच आपले मत गेले की नाही याची पावती व्हीव्हीपॅट मशीनमधून निघणार आहे. मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा हा प्रयोग नागरिकांसाठी सध्या नवखाच आहे.यामुळे ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला घेऊनही नागरिकांत विविध प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. या शंकांचे निरसन न झाल्यास नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास टाळतील याचाही नेम नाही. अशात नागरिकांच्या मनात असलेली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबतची शंका दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती कार्यक्रम राबविला. येत्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम-व्हीव्हीपॅटनेच निवडणुका होणार असल्याने २८ डिसेंबर पासून जिल्ह्यात हा जनजागती कार्यक्रम सुरू करण्यात आला. यांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर पथक गठीत करण्यात आले होते.या जिल्हा व तालुकास्तरावरील पथकांनी ६ तारखेपर्यंत जनजागृती कार्यक्रम राबवून जिल्ह्यात ७९१ ठिकाणी जनजागृती केली.यात पथकाने नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनची कार्यपद्धती समजावून सांगत मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.निवडणुकीत जास्तीतजास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम घेतला.८ तालुका तर १ जिल्हास्तरीय पथकजनजागृतीसाठी तालुकास्तरावर ८ तर जिल्हास्तरावर १ पथक गठीत करण्यात आले आहे. ६ जणांच्या या पथकांत मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता. तालुकास्तरावरील पथकांनी मतदान केंद्र, बाजार, चौक यासारख्या गर्दीच्या ठिकाणांवर जनजागृती कार्यक्रम घेतले. तर जिल्हा पथकाने शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय, मेळावे व मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या कार्यक्रमांत जनजागृती कार्यक्रम घेवून जनजागृतीचे कार्य केले. विशेष म्हणजे, तालुकास्तरावरील पथकांचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र जिल्हास्तरीय पथक कार्यरत असून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन बघून ते जनजागृती करीत आहेत.