शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

न्यायालयाच्या आदेशाचे पोलिसांकडून उल्लंघन

By admin | Updated: November 23, 2014 23:22 IST

संपूर्ण देशभरात रात्री १० वाजतानंतर मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर वाजवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र या आदेशाचे सर्वत्र उल्लंघन होताना दिसून येत आहे.

परसवाडा : संपूर्ण देशभरात रात्री १० वाजतानंतर मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर वाजवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र या आदेशाचे सर्वत्र उल्लंघन होताना दिसून येत आहे. यासाठी पोलीस विभागच जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.दिवाळीचा सण आटोपताच ग्रामीण व शहरी भागात नाट्यप्रयोग, ड्रामा, कीर्तन, तमाशा, दंडार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भागवत आदी कार्यक्रम घेतले जातात. यासाठी डीजे साऊंड व लाऊड स्पीकरची आवश्यकता भासते. एखाद्या नेत्याचा किंवा लोकप्रतिनीचा सत्कार कार्यक्रम असो, त्या ठिकाणी गर्दीसाठी लोकांची गरज असते. त्या ठिकाणी लावणी नृत्य, नाट्यप्रयोग व इतर कार्यक्रम आयोजित केले जातात व रात्री १० वाजतापर्यंत नेत्यांचा उद्घाटन सोहळाच होतो. यानंतर रात्रभर कार्यक्रम चालविले जातात. पोलीस अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून त्या कार्यक्रमाची १० वाजतापर्यंतची परवानगी नियमाने दिली जाते. ही बाब त्यांनाही माहिती असते. पण नेत्यांच्या पुढे वरिष्ठ अधिकारीसुद्धा नतमस्तक होतात. जे लोकप्रतिनिधी संसद व विधानसभेत बसून कायदा तयार करतात, त्यांनाच जाणीव नाही. त्यांनी तर लोकांना जागृत करण्याची गरज आहे. पण होते उलटेच. रात्री १० वाजतानंतर कुठल्याही कार्यक्रमासाठी जावू नये. रात्रीच्या कार्यक्रमासाठी नागरिकांना प्रोत्साहन देवू नये. नेत असो किंवा नागरिक असो पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना कायदा व शिस्त सांगने आवश्यक आहे. ज्यांनी मंजुरी घेतली आहे, तेथे रात्री १० वाजतानंतर कार्यक्रम सुरू असल्यास पोलिसांनी जावून बंद करावे व सर्व साहित्य जप्त करावे. केवळ तक्रार करणेच गरजेचे नाही. कायदा कशासाठी? आजही ग्रामीण भागात मोठ्या आवाजात रात्रीला कार्यक्रम घेतले जातात. पाच ते सहा किमीपर्यंत आवाज येत असतो. पण पोलीस व कार्यकर्त्यांची साठगाठ असते. आयोजकही मी सर्वकाही सांभाळलो आहे, असे मोठ्याने सांगतात. जोपर्यंत पोलीस कायदा सांगणार नाही, तोपर्यंत आळा घालता येणार नाही. ग्रामीण भागात कोणीही तक्रार करण्यास तयार नाही. उलट तक्रारकर्त्यालाच पोलीस धमकावतात. शिवाय तक्रार करूनही पोलीस कारवाई का करीत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. अशीच घटना तिरोडा तालुक्यात गराडा येथे घडली. आमच्या तक्रारीचे काय झाले, असे विचारण्यासाठी शिष्टमंडळ अधिकाऱ्याला भेटले. ते वजनदार नेते व अण्णा हजारेप्रणीत संघटनेचे जिल्हा संघटक असल्याचे कारवाई करण्यात आली. त्यांनी तक्रार कचरापेटीत घातली होती. ज्यावेळी कारवाई करणे अपेक्षित होते, त्यावेळी केली नाही व सुनील बारापात्रे यांच्यावर ५० हजाराचा अर्थिक भुर्दंड बसला. त्यांच्या आईला त्या कार्यक्रमाच्या आवाजाने मागील वर्षी त्रास झाला होता. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून त्यांनी आयोजकांना मनाई व पोलिसांत तक्रार केली होती. पण पोलिसांनी कारवाई केली नाही व रात्रभर कार्यक्रम मोठ्या आवाजात सुरूच राहिला. रात्रभर त्यांच्या आईला व त्यांना मोठ्या ध्वनीचा त्रास सहन करावा लागला. मात्र पोलिसांनी घटनेच्या दोन दिवसानंतर कारवाई केली व अखेर १८ जणांवर गुन्हा नोंद केला.या प्रकारावरून पोलिसांना माहिती असूनही ते कारवाई करीत नाही, हे उघड होते. नागरिकांनी तक्रारीच करत रहायचे काय आणि पोलिसांची जबाबदारी व कर्तव्याचे काय? कायदा सांगणारे कायद्याच्या बाहेर काम करतात. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचा आरोप अण्णा हजारे प्रणीत कार्यकर्त्यांनी केला असून राष्ट्रीय समाजसेवक अण्णा हजारे यांना तसे लेटी पत्रही पाठविले आहे. (वार्ताहर)