शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गावकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांनी दल्लाटोला, कोपालगड, आमाटोला या गावांना भेट दिली.

ठळक मुद्देमूलभूत सुविधा कधी मिळणार । जि.प.सदस्यांनी दिली भेट

न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील पिपरीया जिल्हा परिषद क्षेत्राच्या जि.प.सदस्या दुर्गा तिराले यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील अतिदुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आदिवासी बांधवानी आपल्या व्यथा मांडीत विविध समस्यांचा पाढा तिराले यांच्यासमोर वाचला. समस्या दूर करण्याची मागणी केली.या वेळी कोसमतर्राचे सरपंच कैलास धामडे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल तिराले, सुखीराम कोर्राम, जीवनलाल कोर्राम यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांनी दल्लाटोला, कोपालगड, आमाटोला या गावांना भेट दिली. दल्लाटोला, कोपालगड येथे गावकऱ्यांची सभा घेतली तेव्हा दल्लाटोला येथील लोकांनी सांगितले की त्यांच्या गावात एक तलाव आहे. त्या तलावाच्या पाण्यातून गावकरी आपली गरज भागवितात. तलावाचे गेट नादुरुस्त असल्याने तलावाचा पाण्याचा अपव्यय होतो. त्याचा गावकºयांना कसलाच उपयोग होत नाही. परिणामी गावकऱ्यांना दरवर्षी पाणी टंचाईला समोरे जावे लागते. गावातील अनेक कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. परिणामी अनेक कुटुंबांना उघड्यावर राहावे लागत आहे. गावात अद्यापही विद्युत पथदिवे लावण्यात आले नाही. तर पक्के रस्ते नसल्याने गावकऱ्यांना पावसाळ्यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या भागातील वीज पुरवठा नेहमीच खंडित असतो. त्यामुळे या भागात २४ वीज पुरवठा करण्याची मागणी केली. तिराले यांनी गावकºयांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद