शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा संकटात अन् सरकार निद्रावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:41 IST

तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शैक्षणिक शुल्क माफ करा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव विजय शिवणकर,रमेश ताराम,टिकाराम मेंढे, पं.स.सभापती वंदना बोरकर, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, तुंडीलाल कटरे, मुक्तानंद पटले, सिंधू भुते, तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार, माजी बालकल्याण सभापती संगीता दोनोडे, कविता रहांगडाले, उषा हर्षे, जयश्री फुंडकर, अ‍ॅड. सुषमा शेंडे, आशा बिसेन, उपसरपंच महेंद्र रहांगडाले,सरपंच सुनील ब्राम्हणकर, तुलेंद्र कटरे,जनार्धन शिंगाडे,दीनदयाल चौरागडे, रविंद्र मेश्राम, अंजू बिसेन, सिताराम फुंडे उपस्थित होते.संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना जिवनाआवश्यक वस्तुंची पूर्तत: करावी आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विजय शिवणकर यांनी दिला.सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे यांनी केला.यानंतर गांधी चौकातून मोटारसायकल रॅली काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात तिरथ येटरे, रवि क्षिरसागर, संजू राऊत, तुकडूदास रहांगडाले,संतोष रहांगडाले, विनोद बोरकर, सिध्दार्थ डोंगरे, सुरेंद्र कोटांगले, विजय मुनेश्वर, रविंद्र कोटांगले, पुरुषोत्तम चुटे, बापू भांडारकर, लक्ष्मी येळे, दामोदर शरणागत, भानुप्रसाद कटरे, धनराज बोपचे, मुुलचंद बघेले, प्रदीप फरकुंडे, महेंद्र राऊत, खुमन कटरे, जयश्री पुंडकर, विनोद बोरकर, रवि क्षिरसागर, श्यामराज श्रीराम नोनारे, ईश्वरदास पाथोडे, किशोर रहांगडाले, हरिचंद रहांगडाले, अंतरिक्ष बहेकार, बबनलाल पटले, निखिल पशीने, पियूष छा, मोरेश्वर चापले, प्रलाद बिसेन, राजुकमार गडे, सीताराम फुंडे, सी.के.बिसेन, गोपालकृष्ण रहिले, बाबुलाल कठाणे, अशोक राऊत,नंदकिशोर रहांगडाले, आस्था बिसेन, सुनील भोंडेकर, टिकाराम भांडारकर, भुमेश्वर शिवणकर, ताराचंद काटेखाये यांचा समावेश होता.मागण्या मान्य करातालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी,पशुधन विम्याचे कार्य खाजगी स्तरावरुन न करता शासकीय स्तरावरुन करावे,कृषी पंपासाठी विद्युत जोडणी द्यावी व सोलर पंपाची अट रद्द करावी, विद्युत पंपाना १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा,रासायनिक खताच्या किंमती कमी कराव्या, दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस