शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रबी पेरणीसाठी बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली.

ठळक मुद्देशेतमजुरांची मजुरी वाढली : परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले, अन् शेतकऱ्यांचे खरीप पीक पाण्यात वाहून गेले. हजारोंचा पेरणी, निगराणीचा खर्चही निघत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महागाईमुळे शेतकºयांना मोठे कष्ट करावे लागत आहे. मात्र हे दुख: विसरुन बळीराजा रब्बीच्या पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे.खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली. परतीच्या पावसाने झोडपले. यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात निर्माण झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक सडून गेले. परतीच्या पावसाने धान मातीमोल झाल्याने पेरणीसाठी झालेला खर्च कसा निघणार याची चिंता शेतकºयांना लागली आहे.धानाचे बहरलेले शेत पावसानंतर उत्पादनहीन झाल्याचे पाहून जिल्ह्यातील शेतकरी हतबल होऊन उरले सुरले धान शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.उत्पादन वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडली.यात ही महागाईने तोंड वर काढले. याशिवाय शेती कामातील रोजगारांचा भाव गगनाला भिडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामाकरिता पुरुषांसाठी ३०० तर महिला रोजगाराकरिता १५० रुपये इतका खर्च लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडत असल्याची वास्तविकता निर्माण झाली. पुढील पिके घेण्याची तयारी करण्यासाठी शेतकºयास आता पेरणीच्या दुप्पट खर्च लागत असल्याने नवीन पेरणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे.तणनाशकांच्या किमतीत वाढपावसामुळे शेतात विविध प्रकारचे तण (गवत) वाढले. त्यामुळे शेती मशागत करण्यात अडथळा निर्माण होत आहे. शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने तणनाशक औषधाद्वारे नष्ट करण्यावर शेतकºयांनी भर दिला. परंतु जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करुन भाववाढ केली. २८० रुपयांना मिळणारा तणनाशकाचा डबा आता ३५० रुपयांपेक्षा अधिक किमतीने खरेदी करावा लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती