शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

१२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : सर्वेक्षणाचे आदेश, कृषी विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १५ गावांना पुराचा वेढा निर्माण झाला होता. यामुळे मागील दोन दिवसांपासून या दोन्ही तालुक्यातील १२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे रोवणी केलेले धान वाहून जाण्याची आणि पाण्यामुळे धान सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आणि लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तेथील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी गोंदिया तालुक्यातील नदीकाठालगत असलेल्या डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला, महालगाव आणि तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, मरारटोला, चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी, अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. शिवाय धानपिके सुध्दा पाण्याखाली आले होते.वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.२००६ नंतर म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. गोंदिया आणि तिरोडा कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून प्राथमिक सर्वेक्षणात गोंदिया तालुक्यातील ७५० तर तिरोडा तालुक्यातील ४५० हेक्टर अशी एकूण १२०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. अद्यापही शेतांमध्ये पाणी भरुन असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पंधरा गावे बाधितवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला,महालगाव आणि कवलेवाडा,मरारटोला,चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी,अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या गावामंधील घरांची सुध्दा मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.पाणी भरून असल्याने समस्यानदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहचून सर्वेक्षण करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या अडचण जात आहे.परिणामी नुकसानीचे पंचनामे तयार करुन अहवाल सादर करण्यास तीन चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.दोन महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील चौवीस तासात गोंदिया तालुक्यातील खमारी महसूल मंडळात ६६ मिमी, तर कामठा मंडळात ९९ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.तर जिल्ह्यात बुधवारी सरासरी ६.११ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर