शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

१२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : सर्वेक्षणाचे आदेश, कृषी विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १५ गावांना पुराचा वेढा निर्माण झाला होता. यामुळे मागील दोन दिवसांपासून या दोन्ही तालुक्यातील १२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे रोवणी केलेले धान वाहून जाण्याची आणि पाण्यामुळे धान सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आणि लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तेथील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी गोंदिया तालुक्यातील नदीकाठालगत असलेल्या डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला, महालगाव आणि तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, मरारटोला, चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी, अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. शिवाय धानपिके सुध्दा पाण्याखाली आले होते.वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.२००६ नंतर म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. गोंदिया आणि तिरोडा कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून प्राथमिक सर्वेक्षणात गोंदिया तालुक्यातील ७५० तर तिरोडा तालुक्यातील ४५० हेक्टर अशी एकूण १२०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. अद्यापही शेतांमध्ये पाणी भरुन असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पंधरा गावे बाधितवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला,महालगाव आणि कवलेवाडा,मरारटोला,चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी,अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या गावामंधील घरांची सुध्दा मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.पाणी भरून असल्याने समस्यानदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहचून सर्वेक्षण करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या अडचण जात आहे.परिणामी नुकसानीचे पंचनामे तयार करुन अहवाल सादर करण्यास तीन चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.दोन महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील चौवीस तासात गोंदिया तालुक्यातील खमारी महसूल मंडळात ६६ मिमी, तर कामठा मंडळात ९९ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.तर जिल्ह्यात बुधवारी सरासरी ६.११ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर