शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : सर्वेक्षणाचे आदेश, कृषी विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १५ गावांना पुराचा वेढा निर्माण झाला होता. यामुळे मागील दोन दिवसांपासून या दोन्ही तालुक्यातील १२०० हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे रोवणी केलेले धान वाहून जाण्याची आणि पाण्यामुळे धान सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात आणि लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तेथील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी गोंदिया तालुक्यातील नदीकाठालगत असलेल्या डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला, महालगाव आणि तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, मरारटोला, चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी, अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. शिवाय धानपिके सुध्दा पाण्याखाली आले होते.वैनगंगा आणि बाघ नदी बुधवारी ही दुथडी भरुन वाहत असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतामध्ये पाणी साचून आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच रोवणी केली. पुराच्या पाण्यामुळे ही रोवणी वाहून जाण्याची तसेच बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने ते सडण्याची शक्यता आहे.२००६ नंतर म्हणजे तब्बल १३ वर्षांनंतर या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. गोंदिया आणि तिरोडा कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून प्राथमिक सर्वेक्षणात गोंदिया तालुक्यातील ७५० तर तिरोडा तालुक्यातील ४५० हेक्टर अशी एकूण १२०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. अद्यापही शेतांमध्ये पाणी भरुन असल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.पंधरा गावे बाधितवैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने डांर्गोली, किन्ही, कासा, काटी, ढिवरटोली, बिरसोला,महालगाव आणि कवलेवाडा,मरारटोला,चांदोरी खुर्द, बिहिरीया, गोंडराणी,अर्जुनी, पिपरीया या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या गावामंधील घरांची सुध्दा मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.पाणी भरून असल्याने समस्यानदीकाठालगत असलेल्या गावांमधील शेतांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहचून सर्वेक्षण करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या अडचण जात आहे.परिणामी नुकसानीचे पंचनामे तयार करुन अहवाल सादर करण्यास तीन चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.दोन महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील चौवीस तासात गोंदिया तालुक्यातील खमारी महसूल मंडळात ६६ मिमी, तर कामठा मंडळात ९९ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.तर जिल्ह्यात बुधवारी सरासरी ६.११ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर