शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

देवा, आता तरी अंत पाहू नको! पावसाने वटारले डोळे; असह्य उकाडा, पिकांना धोका वाढला

By कपिल केकत | Updated: August 31, 2023 19:20 IST

आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे एकीकडे पिकांना धोका वाढला आहे.

गोंदिया: आठवडाभरापासून पावसाने डोळे वटारल्यामुळे एकीकडे पिकांना धोका वाढला आहे. तेथेच उकाडा असह्य होत असून, त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. तापत्या उन्हामुळे शेतातील पाणी जिरले असून, वेळीच पाऊस न पडल्यास मात्र पिके हातून जाण्याची स्थिती आहे. यामुळे आरोग्यासाठी सर्वसामान्य, तर पिकांसाठी शेतकरी आकाशाकडे नजरा गाडून असून, प्रत्येकाच्या तोंडून ‘देवा, आता तरी अंत पाहू नको!’ एवढीच आर्त हाक निघत आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पूरपरिस्थिती होती. सर्वदूर पावसामुळे मागील वर्षी कित्येकांची पिके वाहून गेली होती. यंदा मात्र त्या विपरीत परिस्थिती असून, सर्वत्र पावसाची अत्यधिक गरज आहे. पावसाअभावी पिके सुकण्याच्या स्थितीत आली असून, वेळीच पाऊस न बरसल्यास मात्र शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. शिवाय, पाऊस नसल्यामुळे उकाडा वाढत चालला असून, गुरुवारी जिल्ह्याचे तापमान ३३ अंशावर होते. हा उकाडा असह्य होत असून, मधातच पावसाच्या सरी व त्यानंतर उन्हामुळे वातावरण कलुषित झाले असून, आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यातूनच सध्या तापाची साथ सुरू आहे. ऑगस्ट महिना संपला असून, आता मात्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र पिकाचे नुकसान होणार, यात शंका नाही.

फक्त ०.५ मिमी पाऊसमागील दहा-बारा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून, या काळात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने त्यानंतर मात्र उकाडा वाढून तापाची साथ पसरत आहे. हा क्रम सुरूच असून, बुधवारपासून गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त ०.५ मिमी सरासरी पाऊस बरसला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात ०.२ मिमी, तिरोडा तालुक्यात ०.३ मिमी, गोरेगाव ०.५ मिमी, सालेकसा ३.९ मिमी, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ०.२ मिमी पाऊस बरसला आहे.

 जमिनीला भेगा व पिके पिवळसरमागील दहा- बारा दिवसांपूर्वी बरसलेल्या पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळाले, यात शंका नाही. मात्र, एकदा पावसाने दडी मारली व तीच परिस्थिती आता निर्माण होताना दिसत आहे. पाऊस बरसत नसून त्यात ऊन तापून तापमान ३३ अंशावर आले आहे. परिणामी, शेतातील पाणी जिरले असून, पिकांना पाण्याची गरज आहे. आता पाणी मिळाले नाही, तर उन्हामुळे पिके सुकणार, अशी स्थिती तयार होत आहे.

तूट गेली सरासरी ५४८ मिमीवरमागील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १,३६४.३ मिमी पाऊस बरसला होता, तर यंदा ८१६.३ मिमी पाऊस बरसला आहे. यानंतर यंदा सरासरी ५४८ मिमी पावसाची तूट दिसून येत आहे. जसेजसे दिवस वाढत आहेत, तसतशी ही तूट वाढत चालली आहे. नियमित दमदार पावसानंतरच आता ही तूट भरून निघणार.

आतापर्यंत व बुधवारी बरसलेला पाऊसतालुका - ३० ऑगस्ट - आतापर्यंत

  • गोंदिया - ०.२२ - ८४१.४
  • आमगाव - ०.० - ७२३.२
  • तिरोडा - ०.३ - ७०४.३
  • गोरेगाव - ०.५ - ७०२.३
  • सालेकसा - ३.९ - ८६३.५
  • देवरी - ०.० - ८९३.६
  • अर्जुनी-मोरगाव - ०.२ - ९१७.६
  • सडक-अर्जुनी - ०.० - ८२१.० 
टॅग्स :gondiya-acगोंदियाFarmerशेतकरीRainपाऊस