शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
6
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
7
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
8
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
9
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
10
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
11
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
12
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
13
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
14
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
15
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
16
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
17
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
18
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
19
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
20
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यापासून थकले दोनशे कोटी रुपयांचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण देशाचे अर्थचक्र थांबले आहे. मागील जवळपास दोन महिन्यापासून लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहे. याचा सर्वाधिक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. राज्य सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांवर सुध्दा कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे.

ठळक मुद्देबोनस व चुकऱ्यांचा समावेश : निधीची अडचण : शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाºया ४५ हजार शेतकºयांचे धानाचे चुकारे आणि बोनसची दोनशे कोटी रुपयांची रक्कम मागील दोन महिन्यांपासून थकली आहे.त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांची कोंडी झाली असून चुकारे व बोनसची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा दोन महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण देशाचे अर्थचक्र थांबले आहे. मागील जवळपास दोन महिन्यापासून लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहे. याचा सर्वाधिक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. राज्य सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांवर सुध्दा कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. याचाच फटका आता शेतकऱ्यांना सुध्दा बसत आहे. खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. फेडरेशनने खरीपात एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन ३५ लाख क्विंटल धान खरेदी केली.खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ६०० कोटी रुपये आहे. यापैकी आत्तापर्यंत ५०० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. तर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने २०० रुपये प्रती क्विंटल अतिरिक्त दर आणि ५०० बोनस जाहीर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटलमागे ७०० रुपये ५० क्विंटलपर्यंत द्यायचे आहेत. त्यामुळे ही रक्कम २३९ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. मार्च महिन्यापर्यंत शासनाने धान खरेदीसाठी नियमित निधी दिला. मात्र यानंतर सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धानाच्या चुकाऱ्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहे. तर एप्रिल महिन्यात बोनससाठी ११३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता सुध्दा करण्यात आला. मात्र बोनसाठी पुन्हा १०० कोटीच्या निधीची गरज असून तो प्राप्त न झाल्याने बोनसचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे फेडरेशनच्या अधिकाºयांनी सांगितले.खरीपात शेतकऱ्यांची कोंडीखरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे आणि खते, बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळेच त्यांनी दोन महिन्यापूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. मात्र आता विक्री केलेल्या धानाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर कोंडी झाली आहे.पुन्हा महिनाभर करावी लागणार प्रतीक्षाकोरोनामुळे राज्य शासनाचे महसूल मिळण्याचे विविध स्त्रोत आटले असल्याने त्याचा विविध गोष्टींवर परिणाम होत आहे. यामुळेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला निधी मिळण्यास सुध्दा विलंब होत असल्याची माहिती आहे. या विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोनस आणि चुकाऱ्यांसाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी पुन्हा महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी