शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

दोन दिवसांच्या अवकाळीच्या नेहराने जिल्ह्यातील ३८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:08 IST

Gondia : येणारे काही दिवस आहेत पावसाचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असून अवकाळी पावसाने जिल्ह्यात एंट्री मारली आहे. अशातच २७ आणि २८ तारखेला बरसलेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपीटमुळे जिल्ह्यातील सुमारे ३८३२.१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७० गावांना अवकाळीने बाधित केले आहे.

उन्हाळा आपल्या रंगात येत असतानाच अचानकच वातावरणाने बदल घेतला असून अवघ्या विदर्भालाच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. यातूनच जिल्ह्यालाही पुढील चार-पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच रविवारी (दि.२७) व सोमवारी (दि. २८) जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटने दमदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ७० गावे बाधित झाली असून त्यातील सुमारे ३८३२.१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

तर अवकाळी पावसाचा हा खेळ येथेच संपला नसून मंगळवारीही (दि.२९) दिवसा कडक उन्ह तापल्यानंतर सायंकाळी ढग दाटून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली होती. यामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असणार यात शंका नाही. एकंदर दमदार पाऊस, वादळवारा व गारपीट झाल्यास मात्र नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सडक-अर्जुनी तालुक्याला फटका२७ व २८ तारखेला बरसलेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपीटचा सर्वाधिक फटका सडक-अर्जुनी तालुक्याला बसल्याचे अहवालातून दिसून येत आहे. कारण, अवकाळी पावसामुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील ५७ गावे बाधित झाली असून त्यातील ३८२० हेक्टर क्षेत्र व ५७९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तालुक्यातील भात, मका व आंबा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.

अवकाळीमुळे जिल्ह्याचा पारा घसरलाजिल्ह्यात उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली असून पारा ४२ अंशावर गेल्याची नोंद घेण्यात आली आहे. असे असतानाच शनिवारी (दि.२६) पारा ४०.९ अंशावर पोहचला होता. मात्र रविवारी (दि.२७) अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पारा घसरून ३७.४ अंशावर आला होता. तर सोमवारी (दि.२८) पारा ३८ अंशावर आला होता. पावसामुळे पारा घसरला असून उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. 

गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व देवरीतही नुकसानअवकाळी पाऊस व गारपीटमुळे सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक कहर झाला असतानाच गोरेगाव तालुक्यातील ७ गावांतील सुमारे ८.८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २७ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून भात व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ गावांतील सुमारे २ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. येथे दोन शेतकऱ्यांना फटका बसला असून त्यांचे मका पिकाचे नुकसान झाले आहे. तर देवरी तालुक्यातील ४ गावांतील सुमारे १.३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. येथे सात शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. 

गोंदियात लावली पावसाने हजेरीदिवसभर कडक उन्ह तापून अंगाला घामाघूम केल्यानंतर मंगळवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजता दरम्यान अवकाळी पावसाने गोंदिया शहरात हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. शहरात चांगलाच पाऊस बरसला असतानाच जिल्ह्यातील अन्य भागातही पाऊस अपेक्षित आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेती