शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दोन दिवसांच्या अवकाळीच्या नेहराने जिल्ह्यातील ३८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:08 IST

Gondia : येणारे काही दिवस आहेत पावसाचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असून अवकाळी पावसाने जिल्ह्यात एंट्री मारली आहे. अशातच २७ आणि २८ तारखेला बरसलेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपीटमुळे जिल्ह्यातील सुमारे ३८३२.१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७० गावांना अवकाळीने बाधित केले आहे.

उन्हाळा आपल्या रंगात येत असतानाच अचानकच वातावरणाने बदल घेतला असून अवघ्या विदर्भालाच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. यातूनच जिल्ह्यालाही पुढील चार-पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच रविवारी (दि.२७) व सोमवारी (दि. २८) जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीटने दमदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ७० गावे बाधित झाली असून त्यातील सुमारे ३८३२.१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

तर अवकाळी पावसाचा हा खेळ येथेच संपला नसून मंगळवारीही (दि.२९) दिवसा कडक उन्ह तापल्यानंतर सायंकाळी ढग दाटून वादळी वाऱ्याला सुरुवात झाली होती. यामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असणार यात शंका नाही. एकंदर दमदार पाऊस, वादळवारा व गारपीट झाल्यास मात्र नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सडक-अर्जुनी तालुक्याला फटका२७ व २८ तारखेला बरसलेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपीटचा सर्वाधिक फटका सडक-अर्जुनी तालुक्याला बसल्याचे अहवालातून दिसून येत आहे. कारण, अवकाळी पावसामुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील ५७ गावे बाधित झाली असून त्यातील ३८२० हेक्टर क्षेत्र व ५७९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तालुक्यातील भात, मका व आंबा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.

अवकाळीमुळे जिल्ह्याचा पारा घसरलाजिल्ह्यात उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली असून पारा ४२ अंशावर गेल्याची नोंद घेण्यात आली आहे. असे असतानाच शनिवारी (दि.२६) पारा ४०.९ अंशावर पोहचला होता. मात्र रविवारी (दि.२७) अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पारा घसरून ३७.४ अंशावर आला होता. तर सोमवारी (दि.२८) पारा ३८ अंशावर आला होता. पावसामुळे पारा घसरला असून उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. 

गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व देवरीतही नुकसानअवकाळी पाऊस व गारपीटमुळे सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक कहर झाला असतानाच गोरेगाव तालुक्यातील ७ गावांतील सुमारे ८.८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २७ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून भात व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ गावांतील सुमारे २ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. येथे दोन शेतकऱ्यांना फटका बसला असून त्यांचे मका पिकाचे नुकसान झाले आहे. तर देवरी तालुक्यातील ४ गावांतील सुमारे १.३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. येथे सात शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. 

गोंदियात लावली पावसाने हजेरीदिवसभर कडक उन्ह तापून अंगाला घामाघूम केल्यानंतर मंगळवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजता दरम्यान अवकाळी पावसाने गोंदिया शहरात हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. शहरात चांगलाच पाऊस बरसला असतानाच जिल्ह्यातील अन्य भागातही पाऊस अपेक्षित आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेती