शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

मंत्रोपचाराने रंगला तुळशी-शालीग्राम लग्नसोहळा

By admin | Updated: November 16, 2016 01:26 IST

तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा तुळशी विवाह करून आपली ...

खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्याचा भास : हलबीटोल्यात जपताहेत अनोखी परंपरासालेकसा : तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा तुळशी विवाह करून आपली अनोखी परंपरा कायम ठेवली. युवकांचा हा अभिनव उपक्रम पंचकोशीत कौतुकाचा विषय झाला आहे. हा म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नव्हते. पाहुणे मंडळीना रितसर निमंत्रण, २५०० वऱ्ह्याडांची उपस्थिती, स्वागत कमान, वैदिक मंत्रोपचार, मंगलाष्टके आणि भोजन व्यवस्था अशा थाटात तुळशी आणि शालीग्रामचा हा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी पार पडला. कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेदरम्यान तुळशी विवाहाची प्रथा हिंदू संस्कृतीत आहे. तुळशी विवाहानंतरच घरातील उपवर मुला-मुलींची लग्न जोडण्याची प्रक्रिमा सुरू होते. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरच्या व शेजाऱ्यांकडील मंडळीपर्यंत मर्यादीत असते. अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. यंदा त्यांनी अधिकारी, पदाधिकारी, वर्ग इष्टमित्रांना, विवाह संघटनाना व गावातील अनेक लोकांना सुध्दा आमंत्रित केले. आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरून जवळपास २ हजार ५०० मंडळी आली. या सर्वांचे त्या नवयुवकांनी आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत स्वागत केले. भेटीगाठी घेतल्या, प्रवेशद्वारावरच सर्वांचे स्वागत करण्यात आले. एकमेकांची ओळख करून देण्यात आली. या सोहळ्यासाठी लग्नमंडप सजविण्यात आला होता. त्यात तुळशी आणि शालीग्रामच्या नावाचे थर्माकोल लावण्यात आले. वर-वधूची जागा निर्धारीत करण्यात आली. लग्नविधी व मंत्रोपचारा विधी पार पाडण्यासाठी लांजी (म.प्र.), ककोडी येथील पं.विश्वनाथ तिवारी आले होते. त्यांनी वैदिक पध्दतीनुसार विधीवत लग्न सोहळा पार पाडला. यावेळी पोपटलाल हटवार व एन.के.डोळस यांनी या विवाहात सोयऱ्याची भूमिका पार पाडली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री अर्धनारेश्वलाय ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे, उपाध्यक्ष रमेश फरकुंडे, सचिव बाजीराव तरोणे, कोषाधयक्ष दुर्गाप्रसाद साहू, सदस्य पवन पटले, चेतन बिसेन, श्रीणुवई, कोमल टेंभरे, मुनेश्वर कापसे, भरत साहू, संतोष कापसे, सुरेश शेंडे, टोनेंद्र बिसेन, रमेश कापसे, महिला जागृती समिती, ममता कापसे, बिंदेश्वरी बावनथडे, हंसकला शेंडे, रत्नमाला किरसान, द्वारका शेंडे तर युवा शक्ती मंडळाचे लोकेश कोरे, नविन भांडारकर, प्रदीप उईके, शैलेश शेंडे, सुभाष भांडारकर, दामोदर राऊत, कैलाश कापसे, दुर्गेश शेंडे, धर्मशीला उईके, चित्ररेखा तरोणे, आशा नाईक, वैशाली नाईक, लक्ष्मी भांडारकर यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)