शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

मंत्रोपचाराने रंगला तुळशी-शालीग्राम लग्नसोहळा

By admin | Updated: November 16, 2016 01:26 IST

तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा तुळशी विवाह करून आपली ...

खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्याचा भास : हलबीटोल्यात जपताहेत अनोखी परंपरासालेकसा : तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा तुळशी विवाह करून आपली अनोखी परंपरा कायम ठेवली. युवकांचा हा अभिनव उपक्रम पंचकोशीत कौतुकाचा विषय झाला आहे. हा म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नव्हते. पाहुणे मंडळीना रितसर निमंत्रण, २५०० वऱ्ह्याडांची उपस्थिती, स्वागत कमान, वैदिक मंत्रोपचार, मंगलाष्टके आणि भोजन व्यवस्था अशा थाटात तुळशी आणि शालीग्रामचा हा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी पार पडला. कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेदरम्यान तुळशी विवाहाची प्रथा हिंदू संस्कृतीत आहे. तुळशी विवाहानंतरच घरातील उपवर मुला-मुलींची लग्न जोडण्याची प्रक्रिमा सुरू होते. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरच्या व शेजाऱ्यांकडील मंडळीपर्यंत मर्यादीत असते. अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. यंदा त्यांनी अधिकारी, पदाधिकारी, वर्ग इष्टमित्रांना, विवाह संघटनाना व गावातील अनेक लोकांना सुध्दा आमंत्रित केले. आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरून जवळपास २ हजार ५०० मंडळी आली. या सर्वांचे त्या नवयुवकांनी आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत स्वागत केले. भेटीगाठी घेतल्या, प्रवेशद्वारावरच सर्वांचे स्वागत करण्यात आले. एकमेकांची ओळख करून देण्यात आली. या सोहळ्यासाठी लग्नमंडप सजविण्यात आला होता. त्यात तुळशी आणि शालीग्रामच्या नावाचे थर्माकोल लावण्यात आले. वर-वधूची जागा निर्धारीत करण्यात आली. लग्नविधी व मंत्रोपचारा विधी पार पाडण्यासाठी लांजी (म.प्र.), ककोडी येथील पं.विश्वनाथ तिवारी आले होते. त्यांनी वैदिक पध्दतीनुसार विधीवत लग्न सोहळा पार पाडला. यावेळी पोपटलाल हटवार व एन.के.डोळस यांनी या विवाहात सोयऱ्याची भूमिका पार पाडली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री अर्धनारेश्वलाय ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे, उपाध्यक्ष रमेश फरकुंडे, सचिव बाजीराव तरोणे, कोषाधयक्ष दुर्गाप्रसाद साहू, सदस्य पवन पटले, चेतन बिसेन, श्रीणुवई, कोमल टेंभरे, मुनेश्वर कापसे, भरत साहू, संतोष कापसे, सुरेश शेंडे, टोनेंद्र बिसेन, रमेश कापसे, महिला जागृती समिती, ममता कापसे, बिंदेश्वरी बावनथडे, हंसकला शेंडे, रत्नमाला किरसान, द्वारका शेंडे तर युवा शक्ती मंडळाचे लोकेश कोरे, नविन भांडारकर, प्रदीप उईके, शैलेश शेंडे, सुभाष भांडारकर, दामोदर राऊत, कैलाश कापसे, दुर्गेश शेंडे, धर्मशीला उईके, चित्ररेखा तरोणे, आशा नाईक, वैशाली नाईक, लक्ष्मी भांडारकर यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)