शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

मंत्रोपचाराने रंगला तुळशी-शालीग्राम लग्नसोहळा

By admin | Updated: November 16, 2016 01:26 IST

तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा तुळशी विवाह करून आपली ...

खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्याचा भास : हलबीटोल्यात जपताहेत अनोखी परंपरासालेकसा : तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा तुळशी विवाह करून आपली अनोखी परंपरा कायम ठेवली. युवकांचा हा अभिनव उपक्रम पंचकोशीत कौतुकाचा विषय झाला आहे. हा म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नव्हते. पाहुणे मंडळीना रितसर निमंत्रण, २५०० वऱ्ह्याडांची उपस्थिती, स्वागत कमान, वैदिक मंत्रोपचार, मंगलाष्टके आणि भोजन व्यवस्था अशा थाटात तुळशी आणि शालीग्रामचा हा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी पार पडला. कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेदरम्यान तुळशी विवाहाची प्रथा हिंदू संस्कृतीत आहे. तुळशी विवाहानंतरच घरातील उपवर मुला-मुलींची लग्न जोडण्याची प्रक्रिमा सुरू होते. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरच्या व शेजाऱ्यांकडील मंडळीपर्यंत मर्यादीत असते. अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. यंदा त्यांनी अधिकारी, पदाधिकारी, वर्ग इष्टमित्रांना, विवाह संघटनाना व गावातील अनेक लोकांना सुध्दा आमंत्रित केले. आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरून जवळपास २ हजार ५०० मंडळी आली. या सर्वांचे त्या नवयुवकांनी आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत स्वागत केले. भेटीगाठी घेतल्या, प्रवेशद्वारावरच सर्वांचे स्वागत करण्यात आले. एकमेकांची ओळख करून देण्यात आली. या सोहळ्यासाठी लग्नमंडप सजविण्यात आला होता. त्यात तुळशी आणि शालीग्रामच्या नावाचे थर्माकोल लावण्यात आले. वर-वधूची जागा निर्धारीत करण्यात आली. लग्नविधी व मंत्रोपचारा विधी पार पाडण्यासाठी लांजी (म.प्र.), ककोडी येथील पं.विश्वनाथ तिवारी आले होते. त्यांनी वैदिक पध्दतीनुसार विधीवत लग्न सोहळा पार पाडला. यावेळी पोपटलाल हटवार व एन.के.डोळस यांनी या विवाहात सोयऱ्याची भूमिका पार पाडली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री अर्धनारेश्वलाय ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे, उपाध्यक्ष रमेश फरकुंडे, सचिव बाजीराव तरोणे, कोषाधयक्ष दुर्गाप्रसाद साहू, सदस्य पवन पटले, चेतन बिसेन, श्रीणुवई, कोमल टेंभरे, मुनेश्वर कापसे, भरत साहू, संतोष कापसे, सुरेश शेंडे, टोनेंद्र बिसेन, रमेश कापसे, महिला जागृती समिती, ममता कापसे, बिंदेश्वरी बावनथडे, हंसकला शेंडे, रत्नमाला किरसान, द्वारका शेंडे तर युवा शक्ती मंडळाचे लोकेश कोरे, नविन भांडारकर, प्रदीप उईके, शैलेश शेंडे, सुभाष भांडारकर, दामोदर राऊत, कैलाश कापसे, दुर्गेश शेंडे, धर्मशीला उईके, चित्ररेखा तरोणे, आशा नाईक, वैशाली नाईक, लक्ष्मी भांडारकर यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)