शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

उंच फाटकामुळे जनता अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:26 PM

रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्वरीत भुयारी पुलाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देरिसामा फाटकावरील प्रकार : भुयारी पुलाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्वरीत भुयारी पुलाची मागणी केली आहे.रेल्वे फाटकापलीकडे रिसामा ग्रामस्थांची जवळपास ४०० एकर शेती आहे. बाराही महिने याच रेल्वे फाटकावरुन जनतेला आवागमन करावे लागते. प्रामुख्याने शेतकºयांचे ट्रॅक्टर व बैलगाड्यांची सारखी वर्दळ असते. फाटक बंद असल्यास बराच वेळ बैलगाड्या व ट्रक्टरला गाडी जातपर्यंत वाट बघावी लागते.कधीतर दोन गाड्यांच्या आवागनामुळे बराच वेळ थांबावे लागते. अशात बैलगाडी असल्यास अधिकच धोक्याचे असते. रेल्वेचा परिसर उंच असल्याने उभी असलेली बैलगाडी मागे जाते. अशा घटना या रेल्वे फाटकावर घडल्या आहेत.त्यामुळे रेल्व फाटकाला लागून चौकीच्या शेजारी भुयारी पूल अत्यंत गरजेचे आहे. भुयारी पुल असल्यास शेतकºयांनाही कोणतीच भिती राहणार नाही. अधिकाºयांकडे याबाबत मागणी केली असता केवळ आश्वासन मिळाले. निधी मंजूर झाला, मात्र अधिकारी बदलले. नवीन अधिकारी आल्याने फक्त कागदांची हालचाल होत आहे. त्यामुळे आता कामाला वाढीव निधी लागेल. मात्र ठोस आश्वासन किंवा भुयारी पुलाचे काम होण्याचे चिन्ह दिसत नाही. 

टॅग्स :railwayरेल्वे