शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

तालुक्यातील परिवहन समित्या कागदोपत्रीच

By admin | Updated: July 31, 2014 00:07 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुखरुप सुरक्षित व्हावा यासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या सबंधित विभागाने दिले आहेत.

रावणवाडी : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुखरुप सुरक्षित व्हावा यासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या सबंधित विभागाने दिले आहेत. मात्र मोजक्या शाळांमध्ये या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उर्वरीत शाळांमध्ये समित्यांचा बोजवारा उडून त्या समित्या कागदोपत्रीच असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीमुळे शाळांचे दुर्लक्ष होताना दिसते. विद्यार्थ्यांची ने-आण करताना होणाऱ्या अपघाताच्या घटना होऊ नयेत ते टाळता यावे म्हणून शाळांना परिवहन समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील शाळांकडून या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या तसेच शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांवर शालेय प्रशासनाचे नियंत्रण असावे. या उद्देशाने प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश सबंधीत विभागाचे आहेत. मात्र त्या आदेशाप्रमाणे बहुतांश शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्यात आल्याचं नाहीत. परिवहन समितीमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांचा समावेश असतो. मात्र शाळा प्रशासन व पालकांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खासगी शाळांच्या वाहनांमध्ये क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थी कोंबून त्यांची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीकरिता जी वाहने या कामासाठी वापरली जातात ती वाहनेच कालबाह्य झालेले असते आणि त्याच वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतुक होत असल्यामुळे अपघात नेमका कोणत्यावेळी होईल म्हणता येत नाही.करिता विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणाऱ्या पालकांनीही या गैरसोई बद्दल वेळोवेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र या प्रकाराकडे पालक वर्गाचेही दुर्लक्ष होत असल्याने वाहन धारकांना सुगीचे दिवस आले आहेत. पालकांनी आपले पाल्य ज्या वाहनातुन जातात त्यात विद्यार्थ्यांची संख्या, वाहनाची स्थिती, बसण्याची सोय, वाहनचालक व्यसनी तर नाही, त्याचा वाहन चालविण्याचा परवाना या बाबींची पडताळणी सतत केली तर विद्यार्थ्यांचा प्रवास सुखमय सुरक्षित होऊ शकतो. शालेय परिवहन समित्यांनी, विद्यार्थ्यांची ने-आण सुरक्षित होत आहे किंवा नाही, विद्यार्थ्यांना शालेय सुविधा पुरेशा पुरविण्यात येत आहेत की नाही, या सर्व बाबींवर लक्ष ठेऊन काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. (वार्ताहर)