शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील परिवहन समित्या कागदोपत्रीच

By admin | Updated: July 31, 2014 00:07 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुखरुप सुरक्षित व्हावा यासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या सबंधित विभागाने दिले आहेत.

रावणवाडी : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुखरुप सुरक्षित व्हावा यासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या सबंधित विभागाने दिले आहेत. मात्र मोजक्या शाळांमध्ये या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उर्वरीत शाळांमध्ये समित्यांचा बोजवारा उडून त्या समित्या कागदोपत्रीच असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीमुळे शाळांचे दुर्लक्ष होताना दिसते. विद्यार्थ्यांची ने-आण करताना होणाऱ्या अपघाताच्या घटना होऊ नयेत ते टाळता यावे म्हणून शाळांना परिवहन समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील शाळांकडून या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या तसेच शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांवर शालेय प्रशासनाचे नियंत्रण असावे. या उद्देशाने प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश सबंधीत विभागाचे आहेत. मात्र त्या आदेशाप्रमाणे बहुतांश शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्यात आल्याचं नाहीत. परिवहन समितीमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांचा समावेश असतो. मात्र शाळा प्रशासन व पालकांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खासगी शाळांच्या वाहनांमध्ये क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थी कोंबून त्यांची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीकरिता जी वाहने या कामासाठी वापरली जातात ती वाहनेच कालबाह्य झालेले असते आणि त्याच वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतुक होत असल्यामुळे अपघात नेमका कोणत्यावेळी होईल म्हणता येत नाही.करिता विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणाऱ्या पालकांनीही या गैरसोई बद्दल वेळोवेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र या प्रकाराकडे पालक वर्गाचेही दुर्लक्ष होत असल्याने वाहन धारकांना सुगीचे दिवस आले आहेत. पालकांनी आपले पाल्य ज्या वाहनातुन जातात त्यात विद्यार्थ्यांची संख्या, वाहनाची स्थिती, बसण्याची सोय, वाहनचालक व्यसनी तर नाही, त्याचा वाहन चालविण्याचा परवाना या बाबींची पडताळणी सतत केली तर विद्यार्थ्यांचा प्रवास सुखमय सुरक्षित होऊ शकतो. शालेय परिवहन समित्यांनी, विद्यार्थ्यांची ने-आण सुरक्षित होत आहे किंवा नाही, विद्यार्थ्यांना शालेय सुविधा पुरेशा पुरविण्यात येत आहेत की नाही, या सर्व बाबींवर लक्ष ठेऊन काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. (वार्ताहर)