शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

प्लास्टीक पत्रावळींनी हिरावला पारंपारिक रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM

मोह व पळस वृक्षांच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करणे हे एक प्रमुख काम होते. परंतु, प्लास्टीकने केलेले अतिक्रमण, अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांमुळे वनखात्याने लादलेले निर्बंध यामुळे हा व्यवसाय हिरावल्या गेला आहे. त्यांना रोजगारासाठी इतरत्र स्थानांतरण करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देवनखात्याचीही अडसर : ग्रामीण नागरिकांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेती कामाचा हंगाम संपल्यानंतर ग्रामीण नागरिकांच्या हाताला कामे नसतात. अशा परिस्थितीत वनोपजावर आधारीत कामातून त्यांना तात्पुरता रोजगार उपलब्ध व्हायचा. मोह व पळस वृक्षांच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करणे हे एक प्रमुख काम होते. परंतु, प्लास्टीकने केलेले अतिक्रमण, अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांमुळे वनखात्याने लादलेले निर्बंध यामुळे हा व्यवसाय हिरावल्या गेला आहे. त्यांना रोजगारासाठी इतरत्र स्थानांतरण करण्याची वेळ आली आहे.उन्हाळ्यात तेंदू पत्याची पाने गोळा करणे, मोहफुलांचे संकलन, मोह- पळसाची पाने यापासून पत्रावळी तयार करणे, जंगलात जाऊन रानमेवा गोळा करणे या माध्यमातून खेड्यापाड्यातील नागरिकांना उन्हाळ्यात रोजगार मिळत होता. परंतु ही परिस्थिती सध्या पूर्णपणे बदलली आहे. उन्हाळ्यात जंगलालगत वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले हे सुद्धा यासाठी कारणीभूत ठरले आहेत. गोंदिया तालुका विपुल वनसंपदेने समृद्ध आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पानांपासून पत्रावळी तयार करण्याचा व्यवसाय करीत होते. संपर्ण कुटूंब या कामात असल्याने त्यातून त्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत होते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे.पूर्वी खेड्यापाड्यात विवाह, सप्ताह व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात मोह व पळसाच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनवले जात. या पत्रावळीत केलेले जेवण लोकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत यंत्राद्वारे प्लास्टिकच्या पत्रावळी व द्रोण बनवले जावू लागले.किंमतीने कमी आणि वापरण्यास सोपी असलेली प्लास्टीक पत्रावळ सहज उपलब्ध होऊ लागली. विविध रंगात आकर्षक दिसणाºया या पत्रावळी प्लास्टिक सोबतच थर्माकोल व कागदी स्वरुपातही उपलब्ध होऊ लागल्याने, त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली.बंदीतही विक्री सुरुचपानांपासून तयार केलेल्या पत्रावळी पर्यावरणपूरक व आरोग्यदायी आहेत. विशेष म्हणजे, या पत्रावळींचे विघटन होत असल्याने त्यांचा खत म्हणून वापर करता येतो. परंतु, प्लास्टीक पत्रावळींमुळे ही परिस्थिती बदलली. प्लास्टीकचा वापर वाढल्याने प्रदूषणाची समस्याही वाढली. त्या अनुषंगाने शासनाने राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घातली. त्यामुळे पारंपारीक पद्धतीने पळस व मोहाच्या पानांपासून बनविणाऱ्यांचे पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. आजही प्लास्टिक पत्रावळी व द्रोणाचा वापर व विक्री सुरु आहे.

वनसंपदेचा ऱ्हासग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्यात शेतीची कामे नसल्याने घर बसल्या पळस व मोहाच्या पानांपासून पत्रावळी बनविण्याचे काम करीत होते. पूर्वी सगळीकडे वनसंपदा मुबलक प्रमाणात असल्यामुळे झाडाच्या पानांची कमतरता भासत नव्हती. परंतु जंगलातील अवैध वृक्षतोड वाढली. पळसाच्या वृक्षांची विविध कारणांसाठी नेहमीच कत्तल केली जाते. त्यामुळे पानाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला. आता फक्त अक्षयतृतीया, पोळा, श्राद्ध व धार्मिक प्रयोजनाप्रसंगी हिरव्या पत्रावळी विक्रीसाठी आणल्या जातात.

 

टॅग्स :Employeeकर्मचारी