शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आजपासून लालपरी धावणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी ‘लॉकडाऊन’पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद होत्या.

ठळक मुद्देफक्त जिल्ह्यातंर्गत फेऱ्यांची सूट : प्रवासी संख्या बघून होणार वाढ, सुरूवातीला २५ फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेºया बुधवारपासून (दि.६) सुरू होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तसे आदेश आगाराला दिले आहेत. यांतर्गत सुरूवातीला २५ फेऱ्या सुरू केल्या जाणार असून पुढे प्रवासी संख्या बघून त्यात वाढ करता येणार आहे. त्यामुळे महिनाभरानंतर आता परिवहन महामंडळाची लालपरी बुधवारपासून पुन्हा सेवेत येणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी ‘लॉकडाऊन’पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद होत्या. मात्र याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने ती डबघाईस आली आहे. ती रूळावर आणण्यासाठी आता शासनाकडून आॅरेंज व ग्रीन झोनमध्ये काही सेवा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यात शिथिलता देण्यात आली असून बस सेवा सुरू करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया आगाराला मंगळवारी (दि.५) जिल्ह्यातंर्गत बस फेºया बुधवारपासून (दि.६) सुरू करण्याचे आदेश दिले आहे. यांतर्गत बुधवारी २५ फेऱ्या सुरू केल्या जाणार असून प्रवासी संख्या बघता त्यात वाढ केली जाणार असे आगार प्रमुख संजना पटले यांनी सांगीतले.प्रवाशांसाठी होणार सोयीचेसध्या प्रवासाची साधने बंद असल्याने स्थलांतर करीत असलेल्या मजुरांना शिवाय अन्य सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मजुरांचे लोंढे तर पायी-पायीच जाताना दिसत आहेत. मात्र लालपरी बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याने त्यांना सोयीचे होणार आहे. महिनाभर बसेस बंद असल्याने आगाराला कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यात आता बस फेºया सुरू होणार असल्याने राज्याला आर्थिक उत्पन्न मिळणे सुरू होणार आहे.

टॅग्स :state transportएसटी