शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आजपासून जिल्ह्यात बालस्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 13, 2014 23:04 IST

स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी,

गोंदिया : स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी, उपस्थिती, उपक्रमातील सहभाग व दर्जेदार शिक्षणात सकारात्मक बदलाच्या भूमिकेतून केंद्र सरकारच्या आदेशान्वये १४ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये बाल स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व मुख्यकार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसरामुळे प्रफुल्लित वातावरण निर्माण होऊन बालकांमध्ये आरोग्यविषयक चांगल्या सवयी रुजतील. आजारांचे प्रमाण कमी होईल, तसेच राष्ट्र विकासात व आर्थिक वृद्धीस हातभार लागण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी करुन घेऊन त्यांच्या मतदारसंघात बालस्वच्छता मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्याची माहिती जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व मुख्य कार्यकारी अधिकाहरी डी.डी. शिंदे यांनी दिली.बालस्वच्छता मोहिमेंतर्गत दि. १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत १४ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, क्रिडांगणे या ठिकाणच्या स्वच्छतागृहांची पाहणी व उद्घाटन करुन सर्व मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत सांगून स्वच्छता व आरोग्यविषयक शपथ देऊन शालेय स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आपे आहे. १५ नोव्हेंबर रोजी स्वच्छता व स्वच्छ आंगणवाडी उपक्रमांतर्गत शालेय परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यावेळी मुख्याध्यापक मोहिमेचे व परीसर स्वच्दतेचे महत्व सांगणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी वैयक्तिक स्वच्दता आणि बाल आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबरला स्वच्दता अन्न दिवस साजरा करण्यात येऊन या अंतर्गत आरोग्य केंद्रास भेट देऊन आहार व आरोग्याची माहिती देण्यात येणार आहे. १८ रोजी पाण्याबाबत उद्बोधन, जलशुद्धीकरण केंद्रास भेट, पाणी स्वच्छतेचे स्टीकर तयार करणे, शाळेतील पाण्याच्या टाकीची स्वच्छता, अशुद्ध पाण्याचे परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १९ रोजी जागतिक शौचालयादिनी शौचालयाचा वापर व स्वच्दतेबाबत उद्बोधन, स्वच्छतागृह कसे असावे यावर चर्चा घडवविण्याच्या उपक्रमांचा समावेश आहे.उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये बालकांना प्रोत्साहित व प्रेतिर कयन त्यांच्यामार्फत आसपासच्या प्रत्येक घरामध्ये स्वच्छताविषयक संदेश पोहचविण्यासाठी त्यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली जाणार आहे. प्रत्येक बालकास तीन ते चार कुटुंबांना भेटी देऊन त्यामधील सदस्यांना स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा याबाबत माहिती देण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. स्वच्छ भारताचे ध्येय साधण्यासाठी सुरु होत असलेल्या बाल स्वच्छता मोहिमेला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जि.प.चे अध्यक्ष विजय शिवणकर व सीईओ डी.डी. शिंदे यांनी केले आहे.