शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

१३ गावांत १५ दिवसांपासून वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया तालुक्यातील ग्राम जुनेवानी, हनुमानटोला, गंगाझरी, धानुटोला, पांगडी आणि गोरेगाव तालुक्यातील ग्राम बोळूंदा व तिमेझरी, या गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे निर्देश : आतापर्यंत घेतला दोघांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव, तिरोडा व गोंदिया या ३ तालुक्यातील १३ गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची चांगलीच दहशत आहे. या वाघाने आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढल्याने वन विभागाने आता या जंगल परिसरातील गावकºयांना मुनादी देऊन घराबाहेर पडू नये असे निर्देश दिले आहे. त्यामुळे या १३ गावात कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’सह वाघाच्या दहशतीची भर पडली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देश आणि राज्यात सर्वत्र ‘लॉकडाऊन’ व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला आता महिनाभराचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे आधीच ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आणि मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या चिंतेने त्यांना ग्रासले असताना आता त्यात वाघाच्या दहशतीची भर पडली आहे. गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया तालुक्यातील ग्राम जुनेवानी, हनुमानटोला, गंगाझरी, धानुटोला, पांगडी आणि गोरेगाव तालुक्यातील ग्राम बोळूंदा व तिमेझरी, या गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत आहे.२-३ दिवसांनी गावकऱ्यांना या वाघाचे दर्शन होत असल्याने या परिसरातील गावकऱ्यांनी शेतीची कामे सुद्धा पूर्णपणे बंद केली आहे. एकीकडे ‘लॉकडाऊन’ तर दुसरीकडे वाघाच्या दहशतीला गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच २ दिवसांपूर्वी वन व वन्यजीव विभागाने या गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले. मात्र यामुळे गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घ्यायला जाणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील परिस्थिती पाहता वन व वन्यजीव विभागाने गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करु न वाघाचा बंदोबस्त लावावा अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी वनसंरक्षक एस.युवराज यांच्याकडे केली. यावर युवराज तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आहे. मात्र वन विभागाकडून जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त लावला जात नाही तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही.परिसरात नेमके वाघ किती ?तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील जंगला लगत असलेल्या गावांमध्ये मागील १५ दिवसांपासून एका वाघाचा वावर असल्याचे बोलले जात होते. शिवाय वाघाने २ जणांचा बळी सुद्धा घेतला आहे. मात्र भागातील माहितीनुसार या भागात ४ वाघांचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वन आणि वन्यजीव विभागाने या भागात नेमका किती वाघांचा वावर आहे याचा शोध घेवून त्यांचा बंदोबस्त लावण्याची गरज आहे.

टॅग्स :Tigerवाघ