शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

१३ गावांत १५ दिवसांपासून वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया तालुक्यातील ग्राम जुनेवानी, हनुमानटोला, गंगाझरी, धानुटोला, पांगडी आणि गोरेगाव तालुक्यातील ग्राम बोळूंदा व तिमेझरी, या गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे निर्देश : आतापर्यंत घेतला दोघांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव, तिरोडा व गोंदिया या ३ तालुक्यातील १३ गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची चांगलीच दहशत आहे. या वाघाने आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढल्याने वन विभागाने आता या जंगल परिसरातील गावकºयांना मुनादी देऊन घराबाहेर पडू नये असे निर्देश दिले आहे. त्यामुळे या १३ गावात कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’सह वाघाच्या दहशतीची भर पडली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देश आणि राज्यात सर्वत्र ‘लॉकडाऊन’ व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला आता महिनाभराचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे आधीच ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आणि मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या चिंतेने त्यांना ग्रासले असताना आता त्यात वाघाच्या दहशतीची भर पडली आहे. गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया तालुक्यातील ग्राम जुनेवानी, हनुमानटोला, गंगाझरी, धानुटोला, पांगडी आणि गोरेगाव तालुक्यातील ग्राम बोळूंदा व तिमेझरी, या गावांत मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत आहे.२-३ दिवसांनी गावकऱ्यांना या वाघाचे दर्शन होत असल्याने या परिसरातील गावकऱ्यांनी शेतीची कामे सुद्धा पूर्णपणे बंद केली आहे. एकीकडे ‘लॉकडाऊन’ तर दुसरीकडे वाघाच्या दहशतीला गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच २ दिवसांपूर्वी वन व वन्यजीव विभागाने या गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले. मात्र यामुळे गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घ्यायला जाणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील परिस्थिती पाहता वन व वन्यजीव विभागाने गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करु न वाघाचा बंदोबस्त लावावा अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी वनसंरक्षक एस.युवराज यांच्याकडे केली. यावर युवराज तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आहे. मात्र वन विभागाकडून जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त लावला जात नाही तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही.परिसरात नेमके वाघ किती ?तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील जंगला लगत असलेल्या गावांमध्ये मागील १५ दिवसांपासून एका वाघाचा वावर असल्याचे बोलले जात होते. शिवाय वाघाने २ जणांचा बळी सुद्धा घेतला आहे. मात्र भागातील माहितीनुसार या भागात ४ वाघांचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वन आणि वन्यजीव विभागाने या भागात नेमका किती वाघांचा वावर आहे याचा शोध घेवून त्यांचा बंदोबस्त लावण्याची गरज आहे.

टॅग्स :Tigerवाघ