शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

व्याघ्र प्रकल्पातील तलाव तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:21 IST

नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देपाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती : नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लघु पाटबंधारे विभाग व वन्यजीव विभागाचे संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी थाटेझरी तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र तलावाच्या गेटचे बांधकाम निकृष्ट दर्जाच्या करण्यात आल्याने तलावातील पाणी वाहून गेले. यामुळे पावसाळ्यात तलावालगत असलेल्या शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र संबंधित विभागाने यानंतरही या तलावाची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे हा तलाव सध्यास्थितीत पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलावाच्या गेटचे बांधकाम चांगले केले असते तर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले असते. शिवाय वन्यप्राण्यांना सुध्दा पाण्याची सोय झाली असती मात्र लघु पाटबंधारे आणि वन्यजीव विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे तलावाचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. थाटेझरी तलावातील गाळाचा उपसा करुन गेटची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईforestजंगल