शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

मृत्यूचे भय नाही गावाला पोहचायच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्याची भेट झाली. दुपारच्या प्रहरी सूर्य आग ओखत होता. रखरखते उन्ह होती. माँ पेट्रोल पंपसमोर एक तांडा येऊन थबकला.सर्वांग घामानं भिजलेलं होत.

ठळक मुद्देमजुरांची महामार्गावरून पायपीट सुरूच : रेल्वे मार्गाने पायी धोकादायक प्रवास

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : देशात अगदी पहिला लॉकडाऊन लागू झाला तेव्हापासून तर आजतागायत स्थलांतरित मजुरांच्या तांडयांचे आवागमन सुरूच आहे. हजार-बाराशे कि.मी.पायी चालत त्यांच मार्गक्रमण सुरू आहे. आम्हाला मृत्यूच भय नाही, बस कोणत्याही परिस्थितीत गावाला पोहचायचय अशा मजुरांच्या प्रतिक्रि या आहेत.डोक्यावर चिमुरडे व जिवन प्रपंचाचे ओझे वाहत हे तांडे दररोज प्रवास करीत आहेत. ना शुद्ध पिण्याचे पाणी, ना पोटभर खायला अन्न तरी दरमजल करत गावाची ओढ त्यांना सतावित आहे. शुक्र वारी (दि.८) अचानक अर्जुनी मोरगाव-वडसा मार्गावर एका स्थलांतरित मजुरांच्या तांड्याची भेट झाली. दुपारच्या प्रहरी सूर्य आग ओखत होता. रखरखते उन्ह होती. माँ पेट्रोल पंपसमोर एक तांडा येऊन थबकला.सर्वांग घामानं भिजलेलं होत. पायाच्या पोटरीत गोळे व फोड आलेली होती.डांबरी रस्त्याने चालून चालून पादत्राणे झिजली होती. थकलेले पाय व क्षीण झालेले शरीर, अंगात कुठलेही त्राण नव्हते. त्यांच्या या वेदना पाहवत नव्हत्या. बल्लारशा-गोंदिया या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मजुरांच्या तांड्यातील एकाचा सौंदड नजीक रेल्वे धडकेत मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.८) औरंगाबादजवळ रेल्वे अपघातात १६ मजुरांचा मृत्यू झाला.मजुरांचे हे मृत्यू तांडव सुरूच आहे. तांड्यात फिजीकल डिस्टन्स पाळले जात नसल्याने या मजुरांना कोरोना विषाणू संक्र मणाची भीती आहे. अंर्तमनात भीती असली तरी त्यांचा निर्धार एकच आहे मातृभूमीला स्पर्श करण्याचा. सीमेपार मरण्यापेक्षा गावात मेल्यावर सगेसोयरे तरी धावून येतील असा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्यात आहे. याच भरोश्यावर ते शेकडो कि.मी.चा प्रवास करुन गावाकडे परतत आहे.स्वयंसेवी संस्थाच आमचा आधारलॉकडाऊनमुळे हैद्राबाद व इतर राज्यात अडकलेले मजूर आता पायीच आपल्या गावाकडे परतत आहे. रोजगार गेल्याने आणि कंपनी मालकाने सुध्दा हातावर केल्याने त्यांच्याजवळ उदरनिर्वाहासाठी पैसे नाही. अशात शेकडो कि.मी.च्या पायी प्रवासात या मजुरांना स्वंयसेवी आणि सामाजिक संस्थाकडून मदत होत आहे. कुणी जेवणाची तर कुणी पैशाची मदत करीत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थाच आमचा आधार असल्याचे हे स्थलांतरीत मजूर सांगत आहेत.ऑनलाईन नोंदणी करणे ठरते अडचणशासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या स्वगृही सोडण्यासाठी रेल्वे गाड्या आणि बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी मजुरांना नोंदणी करावी लागत आहे. मात्र बºयाच मजुरांना याची माहिती नसल्याने आणि आॅनलाईन प्रक्रिया ही किचकट असल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.आमचा गावच बरालॉकडाऊन लागू झाला. कंपनीच्या मालकाने कामावरुन काढले. बेरोजगारी व उपासमारीचे संकट ओढवले. लॉकडाऊन उघडेल म्हणून काही दिवस वाट पाहिली. लॉकडाऊन उघडलेच नाही.शेवटी कुटुंबासह गावाकडे जाण्याचे ठरविले. सीमाबंदीमुळे कोरोनाच्या भयापेक्षा रस्त्यावरची भीती वाटू लागली. आता एकदा परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. काहीही झाले तरी चालेल पण गावाकडे जाऊच.- प्रकाश पटेल, भलपहारी ( छत्तीसगड)प्रवासात महायातनालॉकडाऊनमुळे दुकाने बंद. सोबत लहान लेकरं. सामानाचं ओझं वाहून नेणं अवघड आहे. खिशात पैसा नाही. खायला अन्नधान्य नाही. मिळेल ते खायचं व पुढे जायचं. रात्री ८ वाजतापासून प्रवास करायचा. दुपारी विश्रांती करायची. पुन्हा ६ वाजता निघायचं. जिथे रात्र होईल तिथे थांबायचं. पायावर गोळे, सूज असते पण वेदना सांगायच्या कुणाला? इकडंतिकडं मरण्यापेक्षा आपल्या गावातच मरू. निदान सगेसोयरे तर अंतिमसंस्कार करतील. यापुढे अशा यातना नको रे बाबा.- गोपाल मिसाद, बालाघाट (मध्यप्रदेश)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या