शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

शहरातील केरकचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:36 IST

Gondia : जागा शोधण्यात नगर परिषद पुन्हा अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातून दररोज ४० टन कचरा निघतो, पण या केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेकडे घनकचरा प्रकल्पाचा अभाव आहे. परिणामी जागा मिळेल तिथे टाक कचरा, अशीच स्थिती आहे. त्यातच आता नगर परिषदेने घनकचरा प्रकल्पासाठी छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीघाटाजवळ जागा निश्चित केली आहे. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून, शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहराची लोकसंख्या दीड लाखावर गेली असून, गेल्या आठ-दहा वर्षांत शहराचा चारही बाजूने विस्तार झाला आहे. शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेने २५० वर सफाई कामगार, ४० घंटागाड्या, ट्रॅक्टर, तसेच नगर परिषदेत स्वतंत्र सफाई विभाग कार्यरत आहे. शहरातून दररोज ४० टन कचरा संकलित होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी १०० वर्षे पूर्ण झालेल्या नगर परिषदेकडे अद्यापही घनकचरा प्रकल्पाची व्यवस्था नाही. त्यामुळे शहराबाहेर जागा मिळेल तिथे टाक कचरा, हेच धोरण अवलंबिले जात आहे. तर, घनकचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करताना अनेकदा अर्थकारण आडवे आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच हा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही. त्यातच आता नगर परिषदेने शहरालगत असलेल्या पांगोली नदीघाट परिसरात घनकचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. हा परिसर शहरालगत असून, यालाच लागून नागरी वसाहत आहे. शिवाय या भागात धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच या परिसरात हा प्रकल्प सुरु करण्यास शहरवासीयांकडून जोरदार विरोध केला जात आहे. शहरातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचा सूर आता उमटत आहे.

"मी दोन दिवसांपूर्वीच गोंदिया नगर परिषदेचा चार्ज घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती नाही. मी याबाबतची सविस्तर माहिती घेऊन सांगतो."- संदीप चिद्रावार, नगर परिषद, मुख्याधिकारी.

घनकचरा प्रकल्पाची जागा कशी बदललीनगर परिषदेने काही महिन्यांपूर्वी चुलोद परिसरातील जागा घनकचरा प्रकल्पासाठी निश्चित केली होती. या ठिकाणी हा प्रकल्प उभारणे जवळपास निश्चित सुद्धा झाला होता, मात्र यानंतर दोन महिन्यांतच नगर परिषदेला या प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात घाणीचे साम्राज्य कायमसध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरातील जवळपास सर्वच भागांत रस्त्यालगत केरकचऱ्याचे ढिगारे पडलेले आढळतात. यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया