शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील केरकचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:36 IST

Gondia : जागा शोधण्यात नगर परिषद पुन्हा अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातून दररोज ४० टन कचरा निघतो, पण या केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेकडे घनकचरा प्रकल्पाचा अभाव आहे. परिणामी जागा मिळेल तिथे टाक कचरा, अशीच स्थिती आहे. त्यातच आता नगर परिषदेने घनकचरा प्रकल्पासाठी छोटा गोंदिया परिसरातील पांगोली नदीघाटाजवळ जागा निश्चित केली आहे. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून, शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहराची लोकसंख्या दीड लाखावर गेली असून, गेल्या आठ-दहा वर्षांत शहराचा चारही बाजूने विस्तार झाला आहे. शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेने २५० वर सफाई कामगार, ४० घंटागाड्या, ट्रॅक्टर, तसेच नगर परिषदेत स्वतंत्र सफाई विभाग कार्यरत आहे. शहरातून दररोज ४० टन कचरा संकलित होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी १०० वर्षे पूर्ण झालेल्या नगर परिषदेकडे अद्यापही घनकचरा प्रकल्पाची व्यवस्था नाही. त्यामुळे शहराबाहेर जागा मिळेल तिथे टाक कचरा, हेच धोरण अवलंबिले जात आहे. तर, घनकचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करताना अनेकदा अर्थकारण आडवे आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच हा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही. त्यातच आता नगर परिषदेने शहरालगत असलेल्या पांगोली नदीघाट परिसरात घनकचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. हा परिसर शहरालगत असून, यालाच लागून नागरी वसाहत आहे. शिवाय या भागात धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच या परिसरात हा प्रकल्प सुरु करण्यास शहरवासीयांकडून जोरदार विरोध केला जात आहे. शहरातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचा सूर आता उमटत आहे.

"मी दोन दिवसांपूर्वीच गोंदिया नगर परिषदेचा चार्ज घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती नाही. मी याबाबतची सविस्तर माहिती घेऊन सांगतो."- संदीप चिद्रावार, नगर परिषद, मुख्याधिकारी.

घनकचरा प्रकल्पाची जागा कशी बदललीनगर परिषदेने काही महिन्यांपूर्वी चुलोद परिसरातील जागा घनकचरा प्रकल्पासाठी निश्चित केली होती. या ठिकाणी हा प्रकल्प उभारणे जवळपास निश्चित सुद्धा झाला होता, मात्र यानंतर दोन महिन्यांतच नगर परिषदेला या प्रकल्पासाठी दुसरी जागा शोधण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात घाणीचे साम्राज्य कायमसध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरातील जवळपास सर्वच भागांत रस्त्यालगत केरकचऱ्याचे ढिगारे पडलेले आढळतात. यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया