शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

नागपूर-गोंदिया पॅसेजरवर वाढतोय प्रवाशांचा ताण

By admin | Updated: February 7, 2015 23:26 IST

ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा

गोंदिया : ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करून कसातरी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या स्थानकांदरम्यान पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी १५ तास ईतवारी रेल्वेस्थानकात उभ्या राहणाऱ्या टाटानगर पॅसेंजरचा वापर करावा, अशी मागणी काही सूज्ञ रेल्वेप्रवाशांनी केली आहे.टाटानगर-ईतवारी (५८१११) ही रेल्वे गाडी गोंदिया स्थानकावर पहाटे ३.२० वाजता येते व पहाटे ३.३० वाजता सुटते. सकाळी ६ वाजतापर्यंत सदर गाडी ईतवारी रेल्वे स्थानकात पोहचते. त्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासाठी सदर गाडी (५८११२) ईतवारी स्थानकातून टाटानगरसाठी रात्री ९.३० वाजता सुटते. ही गाडी दिवसभर तब्बल १५ तासपर्यंत इतवारी रेल्वे स्थानकावर थांबूनच असते. या कालावधी सदर गाडीचा उपयोग करून प्रवाशांना सेवा दिली जावू शकते.सदर गाडी १५ तास ईतवारी रेल्वे स्थानकावर अकारण थांबून राहत असल्याने रेल्वेच्या महसुलात कोणतीही वाढ होत नाही. मात्र या कालावधीत सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया जंक्शनपर्यंत दोन फेऱ्या होवू शकतात. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा होईल व रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची आशा आहे. गोंदिया ते ईतवारी रेल्वे स्थानकादरम्यान पॅसेंजर गाडीचे गंगाझरी, काचेवानी, तिरोडा, मुंडीकोटा, तुमसर रोड, कोका, भंडारा रोड, खात, रेवराल, चाचेर, सालवा, कन्हान, कामठी, कलमना इत्यादी थांबे येतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशी बसतात. शिवाय गोंदिया व इतवारी या थांब्यांवरून बसणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठीच असते. त्यामुळे टाटानगर-ईतवरी या पॅसेंजर गाडीचा उपयोग दिवसा ईतवारी ते गोंदिया प्रवाशाच्या दोन फेऱ्यासाठी केला जावू शकते. त्यामुळे गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रवाशी लाभान्वित होतील व रेल्वेच्या महसुलातही भर होईल. त्यामुळे सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया दरम्यान फेऱ्या वाढविण्याची मागणी होत असून लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)