शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

नागपूर-गोंदिया पॅसेजरवर वाढतोय प्रवाशांचा ताण

By admin | Updated: February 7, 2015 23:26 IST

ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा

गोंदिया : ईतवारी (नागपूर) ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पॅसेंजर गाड्या ‘हाऊसफुल्ल’ होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करून कसातरी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या स्थानकांदरम्यान पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी १५ तास ईतवारी रेल्वेस्थानकात उभ्या राहणाऱ्या टाटानगर पॅसेंजरचा वापर करावा, अशी मागणी काही सूज्ञ रेल्वेप्रवाशांनी केली आहे.टाटानगर-ईतवारी (५८१११) ही रेल्वे गाडी गोंदिया स्थानकावर पहाटे ३.२० वाजता येते व पहाटे ३.३० वाजता सुटते. सकाळी ६ वाजतापर्यंत सदर गाडी ईतवारी रेल्वे स्थानकात पोहचते. त्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासाठी सदर गाडी (५८११२) ईतवारी स्थानकातून टाटानगरसाठी रात्री ९.३० वाजता सुटते. ही गाडी दिवसभर तब्बल १५ तासपर्यंत इतवारी रेल्वे स्थानकावर थांबूनच असते. या कालावधी सदर गाडीचा उपयोग करून प्रवाशांना सेवा दिली जावू शकते.सदर गाडी १५ तास ईतवारी रेल्वे स्थानकावर अकारण थांबून राहत असल्याने रेल्वेच्या महसुलात कोणतीही वाढ होत नाही. मात्र या कालावधीत सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया जंक्शनपर्यंत दोन फेऱ्या होवू शकतात. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा होईल व रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांची आशा आहे. गोंदिया ते ईतवारी रेल्वे स्थानकादरम्यान पॅसेंजर गाडीचे गंगाझरी, काचेवानी, तिरोडा, मुंडीकोटा, तुमसर रोड, कोका, भंडारा रोड, खात, रेवराल, चाचेर, सालवा, कन्हान, कामठी, कलमना इत्यादी थांबे येतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशी बसतात. शिवाय गोंदिया व इतवारी या थांब्यांवरून बसणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठीच असते. त्यामुळे टाटानगर-ईतवरी या पॅसेंजर गाडीचा उपयोग दिवसा ईतवारी ते गोंदिया प्रवाशाच्या दोन फेऱ्यासाठी केला जावू शकते. त्यामुळे गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रवाशी लाभान्वित होतील व रेल्वेच्या महसुलातही भर होईल. त्यामुळे सदर गाडीच्या ईतवारी ते गोंदिया दरम्यान फेऱ्या वाढविण्याची मागणी होत असून लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)