शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

भर उन्हाळ्यात नळ योजना दुरूस्तीसाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:53 IST

उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १३ मे रोजी निविदा मागविली.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विभागाचा प्रताप : गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १३ मे रोजी निविदा मागविली. यावरुन हा विभाग कितपत तत्पर आहे याची प्रचिती येत आहे.जिल्हावासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये, यासाठी प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून आराखडा तयार केला जातो. यंदा भूजल सर्वेक्षण विभागाने उन्हाळ्यात जिल्ह्यातील ३९८ गावे आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सादर केलेल्या आराखड्यातून सुचविली होती. त्यादृष्टीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उपाय योजना सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र या विभागाच्या वेळ काढू धोरणामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावरच राहिल्या. याच दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने या विभागाला वेळ मारुन नेण्यासाठी पुन्हा कालावधी मिळाला.परिणामी मे महिना उजाळूनही पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजनेची कामे सुरू झाली नाही. अनेक गावातील बोअरवेल विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळ योजना बंद आहे. ९६७ च्यावर बोअरवेलची दुरूस्ती त्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्याने झाली नाही. बोअरवेलसाठी लागणाºया पाईपचा सुध्दा तुटवडा परिणामी अनेक बोअरवेलमधून पाणी येत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना बाकीची सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तर प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या या दाव्याची स्वत: या विभागानेच पोल खोल केली आहे. गोंदिया तालुक्यातील तीन गावातील नळ योजेच्या दुरूस्तीसाठी सोमवारी (दि.१३) निविदा मागविण्यात आल्या.त्यामुळे या निविदा केव्हा उघडणार आणि काम केव्हा सुरू होणार तोपर्यंत कदाचित उन्हाळा संपलेलाही असेल अशी स्थिती आहे.दरवर्षी समस्या तरी धडा नाहीचजिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईची समस्या निर्माण होते.जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सुध्दा कोणता तालुक्यात पाणी टंचाईची सर्वाधिक समस्या निर्माण होवू शकतो याचा अंदाज असतो.त्यामुळे त्यादृष्टीने पूर्व तयारी केली असती तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले नसते. मे महिना उजाळूनही या विभागाने बोअरवेल व तसेच नळ योजनेच्या दुरूस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले नाही.त्यावरुन या विभागाला जनतेची किती काळजी आहे दिसून येते.आढावा बैठकातून मलमपट्टीजिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांची ओरड वाढली आहे. प्रशासनाप्रती तीव्र रोष व्याप्त आहे.हा रोष कमी करुन त्यावर मलमपट्टी करण्यासाठी आता प्रत्येक पंचायत समितीस्तरावर पाणी टंचाईच्या आढावा बैठका घेतल्या जात आहे. तसेच काय उपाय योजना करण्याची गरज आहे यासाठी सूचना मागविल्या जात आहे. त्यामुळे प्रशासन किती सजग आहे हे दिसून येते.वरिष्ठांचा वचक हरविलाजि.प.च्या विविध विभागांमध्ये सध्या बराच सावळा गोंधळ सुरू आहे. त्याच जि.प.तील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा देखील एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. मात्र उन्हाळा संपत येत असला तरी पाणी टंचाईच्या उपाय योजनांचा पत्ता नाही.त्यावरुन वरिष्ठांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई