शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

भर उन्हाळ्यात नळ योजना दुरूस्तीसाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:53 IST

उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १३ मे रोजी निविदा मागविली.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विभागाचा प्रताप : गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्यापूर्वी पाणी टंचाईपूर्व उपाय योजना राबविण्यात यंदा जिल्हा प्रशासन पूर्ण अपयशी ठरले.परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भर म्हणजे जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नळ योजना दुरूस्तीच्या कामासाठी १३ मे रोजी निविदा मागविली. यावरुन हा विभाग कितपत तत्पर आहे याची प्रचिती येत आहे.जिल्हावासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये, यासाठी प्रशासनातर्फे जानेवारी महिन्यापासून आराखडा तयार केला जातो. यंदा भूजल सर्वेक्षण विभागाने उन्हाळ्यात जिल्ह्यातील ३९८ गावे आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सादर केलेल्या आराखड्यातून सुचविली होती. त्यादृष्टीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उपाय योजना सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र या विभागाच्या वेळ काढू धोरणामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावरच राहिल्या. याच दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने या विभागाला वेळ मारुन नेण्यासाठी पुन्हा कालावधी मिळाला.परिणामी मे महिना उजाळूनही पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजनेची कामे सुरू झाली नाही. अनेक गावातील बोअरवेल विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळ योजना बंद आहे. ९६७ च्यावर बोअरवेलची दुरूस्ती त्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्याने झाली नाही. बोअरवेलसाठी लागणाºया पाईपचा सुध्दा तुटवडा परिणामी अनेक बोअरवेलमधून पाणी येत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना बाकीची सर्व कामे सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तर प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या या दाव्याची स्वत: या विभागानेच पोल खोल केली आहे. गोंदिया तालुक्यातील तीन गावातील नळ योजेच्या दुरूस्तीसाठी सोमवारी (दि.१३) निविदा मागविण्यात आल्या.त्यामुळे या निविदा केव्हा उघडणार आणि काम केव्हा सुरू होणार तोपर्यंत कदाचित उन्हाळा संपलेलाही असेल अशी स्थिती आहे.दरवर्षी समस्या तरी धडा नाहीचजिल्ह्यात दरवर्षी पाणी टंचाईची समस्या निर्माण होते.जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सुध्दा कोणता तालुक्यात पाणी टंचाईची सर्वाधिक समस्या निर्माण होवू शकतो याचा अंदाज असतो.त्यामुळे त्यादृष्टीने पूर्व तयारी केली असती तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले नसते. मे महिना उजाळूनही या विभागाने बोअरवेल व तसेच नळ योजनेच्या दुरूस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले नाही.त्यावरुन या विभागाला जनतेची किती काळजी आहे दिसून येते.आढावा बैठकातून मलमपट्टीजिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांची ओरड वाढली आहे. प्रशासनाप्रती तीव्र रोष व्याप्त आहे.हा रोष कमी करुन त्यावर मलमपट्टी करण्यासाठी आता प्रत्येक पंचायत समितीस्तरावर पाणी टंचाईच्या आढावा बैठका घेतल्या जात आहे. तसेच काय उपाय योजना करण्याची गरज आहे यासाठी सूचना मागविल्या जात आहे. त्यामुळे प्रशासन किती सजग आहे हे दिसून येते.वरिष्ठांचा वचक हरविलाजि.प.च्या विविध विभागांमध्ये सध्या बराच सावळा गोंधळ सुरू आहे. त्याच जि.प.तील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा देखील एक महत्त्वपूर्ण विभाग आहे. मात्र उन्हाळा संपत येत असला तरी पाणी टंचाईच्या उपाय योजनांचा पत्ता नाही.त्यावरुन वरिष्ठांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई