शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिक्षण ऑनलाईन बदल्या मात्र ऑफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने सर्व जि.प. मुख्यकार्यकारीअधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशिक्षक संघटनेचा विरोध । जिल्हातंर्गत बदल्या, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या १५ जुलैच्या पत्रानुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा चौथा टप्पा ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निणर्याचे शिक्षक संघटनांनी सुध्दा स्वागत केले. मात्र शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या या ऑफलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला असून याला शिक्षक सहकार संघटनेने विरोध दर्शविला आहे. तसेच या बदल्या सुध्दा ऑनलाइन पध्दतीने करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने सर्व जि.प. मुख्यकार्यकारीअधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे जिल्हातंर्गत बदल्यांना सुध्दा तोच निकष लावून ऑनलाइन बदल्या करण्यात याव्या. कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र बदल्यांसाठी आॅफलाइनचा निकष लावला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील दोन वर्षांचा ऑनलाइन बदल्यांचा अनुभव पाहता ९५ टक्के शिक्षक यामुळे समाधानी होते. शिवाय यात भ्रष्टचाराला वाव नसल्याने कुणावर अन्याय झाला नाही. शासनाने कोरोनाचे कारण पुढे करीत ऑफलाइन बदल्या करित असल्याचे म्हटले आहे. मात्र आॅफलाइन बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊन असल्याने शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करायला जाणे सुध्दा शक्य होणार नाही. ऑनलाइन बदल्या केल्यास या सर्व अडचणी दूर होतील. १५ जुलै २०२० च्या पत्रानुसार नव्याने बिंदू नामावली मंजूर करुन आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश दिले आहे. मात्र तसे न करता जुनीच बिंदू नामावली गृहीत धरण्यात यावी. बदल्या करताना ३० सप्टेंबरपर्यंत रिक्त असलेल्या पदांचा विचार करुन आंतरजिल्हा बदल्या करण्यात याव्या. आंतरजिल्हा बदली करण्यापूर्वी शिक्षकांना अर्जात दुरूस्तीसाठी संधी देण्यात यावी.मागील तीन टप्प्यात आंतरजिल्हा बदली होवूनही अद्यापही कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात विभागीय अध्यक्ष रवी अंबुले, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम, कार्याध्यक्ष प्रमोद शहारे, नंदकिशोर उईके, लाखेश्वर लंजे यांचा समावेश होता.

टॅग्स :Teacherशिक्षक