शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघाती सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:45 IST

केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस केला होता. मात्र सत्तेवर येताच या सर्व घोषणांचा सरकारला विसर पडला आहे. मागील साडेचार वर्षांत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे एकही काम सरकारने केले नाही.

ठळक मुद्देवर्षा पटेल : राष्ट्रवादी काँग्रेस महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस केला होता. मात्र सत्तेवर येताच या सर्व घोषणांचा सरकारला विसर पडला आहे. मागील साडेचार वर्षांत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे एकही काम सरकारने केले नाही. उलट शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे सर्वजण त्रस्त झाले. त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकात धडा शिकविण्याचे आवाहन, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.तालुक्यातील तेजस्विनी लॉनमध्ये मंगळवारी (दि.२९) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तालुकास्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कल्याणी भूरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण, पं.स. सदस्य इंदू परशुरामकर, माजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स. सदस्य सुधाकर पेंदरे, माजी पं.स. सभापती वंदना डोंगरवार, माजी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, नगरसेवक चंद्रप्रभा मुनिश्वर, माजी जि.प. सदस्य किरण गावराणे, माजी पं.स. उपसभापती अनुसया लांजेवार उपस्थित होते. वर्षा पटेल म्हणाल्या, महिलांनी आता जागृत होण्याची गरज आहे. महिला मेळाव्याला उपस्थित महिलांची उपस्थिती पाहून महिला आता घराबाहेर पडू लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. महिलांनी चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहण्याचे दिवस आता संपले आहे. महिलांनी घराबाहेरपडून कुटुंब आणि समाजाचा विकास करण्याचे आवाहन केले. कुकडे म्हणाले की, भाजपा सरकारने या देशातील शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त भांडवलदारांचाच विचार केला आहे.चंद्रीकापुरे म्हणाले मागील साडेचार वर्षात या सरकारने ना महिला,शेतकऱ्यांना किंवा बेरोजगारांना कोणालाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे अशा सरकारला त्यांची जागा देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक रजनी गिºहेपुंज यांनी मांडले. संचालन मंजू चंद्रीकापुरे व आभार मंजू डोंगरवार यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस