शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

विश्वासघाती सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:45 IST

केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस केला होता. मात्र सत्तेवर येताच या सर्व घोषणांचा सरकारला विसर पडला आहे. मागील साडेचार वर्षांत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे एकही काम सरकारने केले नाही.

ठळक मुद्देवर्षा पटेल : राष्ट्रवादी काँग्रेस महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस केला होता. मात्र सत्तेवर येताच या सर्व घोषणांचा सरकारला विसर पडला आहे. मागील साडेचार वर्षांत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे एकही काम सरकारने केले नाही. उलट शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे सर्वजण त्रस्त झाले. त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकात धडा शिकविण्याचे आवाहन, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.तालुक्यातील तेजस्विनी लॉनमध्ये मंगळवारी (दि.२९) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तालुकास्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कल्याणी भूरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण, पं.स. सदस्य इंदू परशुरामकर, माजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स. सदस्य सुधाकर पेंदरे, माजी पं.स. सभापती वंदना डोंगरवार, माजी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, नगरसेवक चंद्रप्रभा मुनिश्वर, माजी जि.प. सदस्य किरण गावराणे, माजी पं.स. उपसभापती अनुसया लांजेवार उपस्थित होते. वर्षा पटेल म्हणाल्या, महिलांनी आता जागृत होण्याची गरज आहे. महिला मेळाव्याला उपस्थित महिलांची उपस्थिती पाहून महिला आता घराबाहेर पडू लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. महिलांनी चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहण्याचे दिवस आता संपले आहे. महिलांनी घराबाहेरपडून कुटुंब आणि समाजाचा विकास करण्याचे आवाहन केले. कुकडे म्हणाले की, भाजपा सरकारने या देशातील शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त भांडवलदारांचाच विचार केला आहे.चंद्रीकापुरे म्हणाले मागील साडेचार वर्षात या सरकारने ना महिला,शेतकऱ्यांना किंवा बेरोजगारांना कोणालाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे अशा सरकारला त्यांची जागा देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक रजनी गिºहेपुंज यांनी मांडले. संचालन मंजू चंद्रीकापुरे व आभार मंजू डोंगरवार यांनी मानले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस