शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:56 IST

हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने ....

ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर वरील रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे आता पाऊस झालाही तरी शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून दुष्काळी परिस्थिती बघता शेतकºयांना मदत करण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात, ३१ जुलैच्या स्तरावर जिल्ह्यात सरासरी ६७४.८७ मिमी. पावसाची आवश्यकता असते. परंतु फक्त ४४२.०१ मिमी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ४० टक्के असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व शेत मजुर अडचणीत असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, संपूर्ण जिल्ह्यात धानाची नर्सरी न लावलेल्या शेतीचे कृषी व महसूल विभागाच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे, धानाची नर्सरी ज्या शेतकºयांनी पाण्याच्या अभावी लावली नाही त्या शेतकºयांना तातडीने मदत करणे, जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.त्या संबंधी उपाययोजना करणे, ज्या शेतकºयांनी या हंगामामध्ये शेतीसाठी बियाणे व खतांवर लाखो रुपये खर्च केले त्याची भरपाई शासनाकडून करणे, अशा शेतकºयांची यादी तयार करुन ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांना तातडीने विशेष बाब म्हणून शासनाच्यावतीने पीक विमा योजना काढणे, नर्सरी लावली परंतु पाऊस नसल्याने ती मरत आहे त्या शेतकºयांचे सर्वेक्षण करुन मदत करने व विशेष बाब म्हणून पीक विमा करणे, मागेल त्याला काम या दृष्टीने महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे नियोजन करुन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर त्यांचेच गावात कामे उपलब्ध करुन देणे, पुढील हंगामासाठी शेतकºयांना मोफत बियाणे व खते उपलब्ध करुन देणे, ज्या शेतकºयांकडे बॅकांची अल्प मुदती व मध्य मुदती चालू व थकीत कर्ज आहे ते माफ करणे, शेतकºयांकडील जनावरांसाठी छावण्या सुरु करुन मोफत चारा उपलब्ध करुन देणे, हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून हवामान खात्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे, पडीत जमिनीमध्ये ज्वारी सारखी कमी पावसाची पिके घेत येत असतील तर त्या दृष्टीने शेतकºयांना मदत करण्यात यावी अशी मागणी केली. अशात दुष्काळी परिस्थिती बघता शासनस्तरावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिलाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रीकापुरे, अशोक सहारे, शिव शर्मा, टिकाराम मेंढे, राजू एन. जैन, डुमेश चौरागडे, केतन तुरकर, जितेश टेंभरे, तिर्थराज हरिणखेडे, रमेश गौतम, कैलास पटले, सुखराम फुंडे, नानू मुदलीयार, जगदीश बहेकार, रफीक खान, गणेश बरडे, देवेंद्रसिंह मच्छिरके,लता रहांगडाले, जिम्मी गुप्ता, प्रमोद शिवणकर,गुड्डू बिसेन, मदन चिखलोंढे, राजेश तुरकर, रामु चुटे, विनायक शर्मा, रौनक ठाकुर, नितेश बहेकार, मनिष अग्रहरी, एकनाथ वहिले, संजीव राय, रमन उके, चंद्रकुमार चुटे, नरेंद्र ठाकुर, ज्ञानेश्वर पगरवार, करन टेकाम, सुरेश कावळे, महेंद्र बघेले, खेमराज शरणागत, सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.