शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

दुष्काळासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:56 IST

हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने ....

ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर वरील रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे आता पाऊस झालाही तरी शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून दुष्काळी परिस्थिती बघता शेतकºयांना मदत करण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात, ३१ जुलैच्या स्तरावर जिल्ह्यात सरासरी ६७४.८७ मिमी. पावसाची आवश्यकता असते. परंतु फक्त ४४२.०१ मिमी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ४० टक्के असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व शेत मजुर अडचणीत असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, संपूर्ण जिल्ह्यात धानाची नर्सरी न लावलेल्या शेतीचे कृषी व महसूल विभागाच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे, धानाची नर्सरी ज्या शेतकºयांनी पाण्याच्या अभावी लावली नाही त्या शेतकºयांना तातडीने मदत करणे, जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.त्या संबंधी उपाययोजना करणे, ज्या शेतकºयांनी या हंगामामध्ये शेतीसाठी बियाणे व खतांवर लाखो रुपये खर्च केले त्याची भरपाई शासनाकडून करणे, अशा शेतकºयांची यादी तयार करुन ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांना तातडीने विशेष बाब म्हणून शासनाच्यावतीने पीक विमा योजना काढणे, नर्सरी लावली परंतु पाऊस नसल्याने ती मरत आहे त्या शेतकºयांचे सर्वेक्षण करुन मदत करने व विशेष बाब म्हणून पीक विमा करणे, मागेल त्याला काम या दृष्टीने महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे नियोजन करुन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर त्यांचेच गावात कामे उपलब्ध करुन देणे, पुढील हंगामासाठी शेतकºयांना मोफत बियाणे व खते उपलब्ध करुन देणे, ज्या शेतकºयांकडे बॅकांची अल्प मुदती व मध्य मुदती चालू व थकीत कर्ज आहे ते माफ करणे, शेतकºयांकडील जनावरांसाठी छावण्या सुरु करुन मोफत चारा उपलब्ध करुन देणे, हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून हवामान खात्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे, पडीत जमिनीमध्ये ज्वारी सारखी कमी पावसाची पिके घेत येत असतील तर त्या दृष्टीने शेतकºयांना मदत करण्यात यावी अशी मागणी केली. अशात दुष्काळी परिस्थिती बघता शासनस्तरावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिलाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रीकापुरे, अशोक सहारे, शिव शर्मा, टिकाराम मेंढे, राजू एन. जैन, डुमेश चौरागडे, केतन तुरकर, जितेश टेंभरे, तिर्थराज हरिणखेडे, रमेश गौतम, कैलास पटले, सुखराम फुंडे, नानू मुदलीयार, जगदीश बहेकार, रफीक खान, गणेश बरडे, देवेंद्रसिंह मच्छिरके,लता रहांगडाले, जिम्मी गुप्ता, प्रमोद शिवणकर,गुड्डू बिसेन, मदन चिखलोंढे, राजेश तुरकर, रामु चुटे, विनायक शर्मा, रौनक ठाकुर, नितेश बहेकार, मनिष अग्रहरी, एकनाथ वहिले, संजीव राय, रमन उके, चंद्रकुमार चुटे, नरेंद्र ठाकुर, ज्ञानेश्वर पगरवार, करन टेकाम, सुरेश कावळे, महेंद्र बघेले, खेमराज शरणागत, सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.