शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पहिली ते चौथीतील विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक; पण पालक म्हणतात तूर्तास नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर ...

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. १५ जानेवारीपासून महाविद्यालयेसुद्धा सुरू होणार आहेत; पण पहिली ते चौथीसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण आता शाळेत जावे, असे वाटत असले तरी त्यांच्या पालकांची मात्र अद्यापही यासाठी मानसिकता तयार झालेली नाही. अजून काही दिवस वाट पाहू. त्यानंतरच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेऊ. मात्र, तूर्तास तरी यासाठी घाई नको, असा सूर पालकांमध्ये आहे, तर मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने पहिली ते चौथीचे सर्वच विद्यार्थी घरीच आहेर. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी मुले घरी राहून कंटाळली आहेत. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे, तर कधी एकदाची शाळा सुरू होते आणि आपले आई-वडील आपल्याला शाळेत पाठवितात याची उत्सुकता मुलांमध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग जरी पूर्णपणे कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आली असली, तर पालकांना अजूनही आपल्या पाल्यांची काळजी वाटत असून, शाळांमध्ये पाठविल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेतली जाणार की नाही, अशी चिंतासुद्धा त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते तूर्तास तरी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

......

जिल्ह्यातील एकूण पहिली ते चौथीच्या शाळा

८३४

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची संख्या

४२,२३०

...........

मुलांना हवी शाळा; पण पालकांची ना

घरी राहून मलासुद्धा आता कंटाळा आला आहे. कधी एकदाची शाळा सुरू होते आणि मी शाळेत जातो याची उत्सुकता लागली आहे; पण माझे ममी-पप्पा काळजीपोटी अजून काही दिवस शाळेत जाऊ नको म्हणतात.

-राघिनी शेंडे, इयत्ता पहिली

......

शाळा बंद असली तरी आमचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे; पण जी मजा शाळेत गेल्यानंतर येते ती मजा या अभ्यासात येत नाही. शाळा सुरू झाली, तर मी नक्कीच शाळेत जाईन.

-रोहित हिवारे, इयत्ता दुसरी

......

माझा मोठा भाऊ पण आता शाळेत जात आहे; पण आमची शाळा अजून सुरू झाली नाही. आमची शाळा सुरू झाल्यावर मीपण नियमित शाळेत जाईन. घरी राहून आता कंटाळाला आला आहे.

-प्रत्यूष अग्निहोत्री, इयत्ता तिसरी

...

कोरोनामुळे वर्षभरापासून शाळेत जाता आले नाही, तर घरी राहून ऑनलाइन अभ्यास आणि शाळा करून कंटाळा आला आहे. जी मजा शाळेत जाऊन शिक्षण घेण्यात येते ती यात नाही. शाळा सुरू झाल्यास मीसुद्धा नियमित शाळेत जाईन.

-पार्थ नक्षिणे, इयत्ता चौथी

.........

पालकांची चिंता कायम

कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असला तरी पहिली ते चौथीत जाणारी मुले ही लहान असतात. त्यामुळे ती शाळेत गेल्यानंतर स्वत:ची काळजी घेणार की नाही, हे सांगता येत नाही. तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत.

-श्वेता मस्के, पालक

.....

शासन जरी पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा विचार करत असले तरी पालक तयार होणार नाहीत. अजून काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तूर्तास तरी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई करणार नाही.

-डॉली काकडे, पालक

......

पहिली ते चौथीत शिकणारी मुले ही फार लहान असतात. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर स्वत:ची तेवढी काळजी घेऊ शकणार नाहीत, तर पालकांनासुद्धा सतत काळजी लागून राहील. त्यामुळे तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत.

-प्रशांत मेश्राम, पालक

.....

पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या तरी मी माझ्या पाल्यांना सध्या तरी शाळेत पाठविणार नाही. अजून काही दिवस वाट पाहणार, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरच मुलांना शाळेत पाठविणार. शाळेत पाठविण्याची घाई नको.

-प्रमोद पारखी, पालक

....