शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

विद्यार्थी उद्याचे भाग्यविधाते

By admin | Updated: December 19, 2015 01:48 IST

माणसाची खरी ओळख ही त्याच्या अंतरी असलेल्या गुणांमुळे होत असते. विद्यार्थ्यांत शिवाजी महाराज, रवंीद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष लपले आहेत.

पी.जी. कटरे : पंचशील महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव थाटातसालेकसा : माणसाची खरी ओळख ही त्याच्या अंतरी असलेल्या गुणांमुळे होत असते. विद्यार्थ्यांत शिवाजी महाराज, रवंीद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष लपले आहेत. कारण विद्यार्थी हेच उद्याचे भाग्यविधाते असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी केले. तालुक्यातील ग्राम मक्काटोला येथील पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवांतर्गत आयोजित पालक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती देवराज वडगाये होते. प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य सुधाकर चौधरी, पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे, मेघराज हेमणे, बंडू चूटे, केशोदास शहारे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किसन चकोले, जयेंद्र अंबादे उपस्थित होते. याप्रसंगी वडगाये यांनी, स्पर्धेच्या युगात ज्ञानी होऊन जिवनाचा शोध घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने धडपड करून आपले ध्येय गाठावे असे मत मांडले. आपल्यातील कला ओळखून तिला आकार द्यावा आपल्यातील कला ओळखून तिला आकार द्यावा आणि देशाचा चांगला नागरिक उभा करण्याची भूमिका शिक्षकांची असावी असे प्रतिपादन प्रबोधनकार बाबा नंदनपवार यांनी केले. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन प्राचार्य भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम भुस्कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव दिलीप मेश्राम, अ‍ॅड. प्रशांत तायडे, प्रा.डॉ. अमोल शामकुवर, डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, राहूल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी.बी.बिसेन व पंचशील महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी.मेश्राम, माजी विद्यार्थी चंद्रकुमार बहेकार, प्रकाश ब्राम्हणकर, किशोर रहांगडाले, रिना शहारे, सिने अभिनेत्री पायल कोटांगले, शुभम वालदे उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवर व निवडक माजी विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, संविधान उद्देशिका व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक डॉ. भुस्कुटे यांनी, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य मेश्राम यांनी, शासनाने शाळेसाठी खाजगी व शासकीय असा भेदाभेद करू नये, प्रलोभन नाहीतर प्रेरणा देणारे धोरण आखावे असे मत मांडले.ग्रामीण विद्यार्थिनींत गगनभरारी घेण्याची क्षमता ग्रामीण भागातही शिक्षणाचा प्रसार झालेला असून ग्रामीण मुलींनी जिद्द ठेवली व पालकांनी त्यांना सहकार्य केले तर मुलीसुध्दा गगनभरारी घेऊ शकतात असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांनी केले. त्या महाविद्यालयात आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कवयित्री सपना बंसोड होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, कवयित्री अंजना खुणे, मक्काटोलाच्या सरपंच आशा खांडवाये, भजेपारच्या सरपंच प्रभा कलचार, आरोग्य सेविका एस.के. गोखले मक्काटोलाच्या उपसरपंच गीता शहारे उपस्थित होत्या. महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी वाईट रुढी व अंधश्रध्दा दूर करणे आवश्यक आहे, असे आवाहन कवयित्री बंसोड यांनी केले. कवयित्री खुणे यांनी, आपल्या कवितांच्या माध्यमातून उपस्थित महिलांना संदेश दिला. प्रास्ताविक शिक्षिका एस.एम. उके यांनी मांडले. संचालन डी.एस. रोकडे यांनी केले. आभार पी.टी. भालेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.