शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे; कोरोनाकाळात शाळा बंदचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:55 IST

२२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत.

गोंदिया : कोरोनाच्या काळात दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे युनोस्कोच्या अहवालानुसार शालेय शिक्षणाचा जवळपास ६० टक्के वेळ वाया गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा अ, ब, क, ड चे धडे गिरवावे लागणार आहेत.

गोंदिया जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा मूळ शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या विद्यार्थ्यांना अ, ब, क, ड चे व १ ते १०० पर्यंतचे धडे गिरवावे लागणार आहेत.

पुन्हा नव्याने सुरुवात

आपला पाल्य पहिलीत गेल्यावर त्याला आद्याक्षरे, आकडेमोड, शिकविली जाते. शाळेत प्रवेश घेतला अन् शाळा बंद झाली. अशी परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांची आहे. आता विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने मूळ शिक्षण द्यावे लागणार आहे.

अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक कंटाळले

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि आमची मुले घरातच राहिली. त्यांचा अभ्यासाशी असलेला घनिष्ट संबंध कमी झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागेल.

-शंकर मेश्राम पालक, पदमपूर

आधी शाळा सुरू होती तर आमची मुले हुशार होती. कोरोनाने शाळा बंद पडल्या आणि आमची मुले अभ्यास विसरली. त्यांनी पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे.

- वैशाली अरविंद भुते, पालक, शिवणी

चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये

इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. सूचना प्राप्त होताच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाईल. गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्नही केले जाणार आहेत. यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थी म्हणतात...

शाळा बंद असल्याने अभ्यासच केेला नाही. आता शाळेत शिकविले तर शिक्षणाचा कंटाळा येऊ लागला आहे. आता शाळेत जाणेही जड वाटत आहे. शिक्षकांनी समजाविले तर मी विसरतो.

- यश दिवाळे, विद्यार्थी, किडंगीपार

जिल्ह्यातील एकूण शाळा- १६६३

शासकीय शाळा-१०३९

खासगी शाळा- ६२४

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी