शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे; कोरोनाकाळात शाळा बंदचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:55 IST

२२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत.

गोंदिया : कोरोनाच्या काळात दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे युनोस्कोच्या अहवालानुसार शालेय शिक्षणाचा जवळपास ६० टक्के वेळ वाया गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा अ, ब, क, ड चे धडे गिरवावे लागणार आहेत.

गोंदिया जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा मूळ शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या विद्यार्थ्यांना अ, ब, क, ड चे व १ ते १०० पर्यंतचे धडे गिरवावे लागणार आहेत.

पुन्हा नव्याने सुरुवात

आपला पाल्य पहिलीत गेल्यावर त्याला आद्याक्षरे, आकडेमोड, शिकविली जाते. शाळेत प्रवेश घेतला अन् शाळा बंद झाली. अशी परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांची आहे. आता विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने मूळ शिक्षण द्यावे लागणार आहे.

अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक कंटाळले

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि आमची मुले घरातच राहिली. त्यांचा अभ्यासाशी असलेला घनिष्ट संबंध कमी झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागेल.

-शंकर मेश्राम पालक, पदमपूर

आधी शाळा सुरू होती तर आमची मुले हुशार होती. कोरोनाने शाळा बंद पडल्या आणि आमची मुले अभ्यास विसरली. त्यांनी पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे.

- वैशाली अरविंद भुते, पालक, शिवणी

चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये

इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. सूचना प्राप्त होताच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाईल. गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्नही केले जाणार आहेत. यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थी म्हणतात...

शाळा बंद असल्याने अभ्यासच केेला नाही. आता शाळेत शिकविले तर शिक्षणाचा कंटाळा येऊ लागला आहे. आता शाळेत जाणेही जड वाटत आहे. शिक्षकांनी समजाविले तर मी विसरतो.

- यश दिवाळे, विद्यार्थी, किडंगीपार

जिल्ह्यातील एकूण शाळा- १६६३

शासकीय शाळा-१०३९

खासगी शाळा- ६२४

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी