शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे; कोरोनाकाळात शाळा बंदचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:55 IST

२२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत.

गोंदिया : कोरोनाच्या काळात दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे युनोस्कोच्या अहवालानुसार शालेय शिक्षणाचा जवळपास ६० टक्के वेळ वाया गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा अ, ब, क, ड चे धडे गिरवावे लागणार आहेत.

गोंदिया जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा मूळ शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या विद्यार्थ्यांना अ, ब, क, ड चे व १ ते १०० पर्यंतचे धडे गिरवावे लागणार आहेत.

पुन्हा नव्याने सुरुवात

आपला पाल्य पहिलीत गेल्यावर त्याला आद्याक्षरे, आकडेमोड, शिकविली जाते. शाळेत प्रवेश घेतला अन् शाळा बंद झाली. अशी परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांची आहे. आता विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने मूळ शिक्षण द्यावे लागणार आहे.

अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक कंटाळले

कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि आमची मुले घरातच राहिली. त्यांचा अभ्यासाशी असलेला घनिष्ट संबंध कमी झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागेल.

-शंकर मेश्राम पालक, पदमपूर

आधी शाळा सुरू होती तर आमची मुले हुशार होती. कोरोनाने शाळा बंद पडल्या आणि आमची मुले अभ्यास विसरली. त्यांनी पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे.

- वैशाली अरविंद भुते, पालक, शिवणी

चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये

इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. सूचना प्राप्त होताच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाईल. गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्नही केले जाणार आहेत. यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थी म्हणतात...

शाळा बंद असल्याने अभ्यासच केेला नाही. आता शाळेत शिकविले तर शिक्षणाचा कंटाळा येऊ लागला आहे. आता शाळेत जाणेही जड वाटत आहे. शिक्षकांनी समजाविले तर मी विसरतो.

- यश दिवाळे, विद्यार्थी, किडंगीपार

जिल्ह्यातील एकूण शाळा- १६६३

शासकीय शाळा-१०३९

खासगी शाळा- ६२४

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी