शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वादळी पावसाचा ३०० एकरातील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:08 AM

जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देफळबागांचे सर्वाधिक नुकसान : कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. सर्वेक्षणानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने रविवारी (दि.१२) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस व गारपिटीचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके आणि फळाबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा, गहू या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पावसाअभावी मागील खरीप हंगामात शेतकºयांना हाती आलेले पिके गमावावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. खरीपात झालेले नुकसान रब्बी पिकाची लागवड करुन भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र रविवारी झालेल्या वादळी पावसाचा गहू, हरभरा, धान या पिकांना फटका बसल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेल्या. वादळी पावसामुळे शेतातील गव्हाचे पीक झोपून गेले. जिल्ह्यात यंदा २४ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात गहू, धान, लाखोळी, हरभरा, मक्का या पिकांचा समावेश आहे. तीनशे ते चारशे एकरवर पपई, अ‍ॅपल बोर यांच्या फळबागा आहेत. वादळी पावसामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील तिनशे एकरातील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली. राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी कृृषी विभागाला वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कृषी विभागाने सोमवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. आठवडाभरात नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.९६ घरांची पडझडजिल्ह्यात रविवारी (दि.१२) झालेल्या वादळी-पावसामुळे ९६ घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी गुरांचे गोठे व घरावरील टिनाचे छप्पर उडाल्याची माहिती आहे. जिल्हा आपत्तीनिवारण विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.