शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

सुरक्षेच्या दृष्टीने १५ जुलैनंतर वर्ग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा १ जुलैपासून सुरु करण्यास विविध अडचणी शासकीय व खाजगी शिक्षण संस्थाचालकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळा केव्हा व कशाप्रकारे सुरू कराव्या यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा ऑनलाईन घेण्यात आली.

ठळक मुद्देशिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना : संघटनेच्या सभेत घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुुनी-मोरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यातही पावसाळा हा आजारांचा काळ असून सर्दी-खोकला व ताप असे आजार बळावतात. अशात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ जुलैपासून इयत्ता ९, १० व १२ वीचे ऑनलाईन वर्ग तर १५ जुलै नंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेने घेतला आहे.संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा १ जुलैपासून सुरु करण्यास विविध अडचणी शासकीय व खाजगी शिक्षण संस्थाचालकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळा केव्हा व कशाप्रकारे सुरू कराव्या यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा ऑनलाईन घेण्यात आली. सभेत मानव विकास योजना व महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस अद्याप सुरू न झाल्याने ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण- येणे शक्य होणार नाही. पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला असे विविध आजार वाढतील हा गंभीर प्रश्न आहे. संस्थाचालक व शाळा व्यवस्थापन समितीवरच शाळा सुरू करण्यासाठी संपूर्णपणे जबाबदारी टाकने योग्य वाटत नाही. काही मोठ्या शाळांची विद्यार्थी संख्या हजारोंच्या घरात असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य उपाययोजनांचे पालन करणे शक्य होणार नाही. त्यात शाळा सुटल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग कसे बघणार हा गंभीर प्रश्न निर्माण होईल व शाळेसाठी ही फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे.समाज कल्याण विभागांतर्गत वस्तीगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. या सर्व समस्येबाबत पालकांशी चर्चा केल्यानंतर नियम व जबाबदारी घेण्यासाठी पालकांची मानसिकता दिसून येत नाही. ग्रामपंचायतने शाळांचे तात्पुरते निर्जंतुकीकरण करून दिले असले तरी साबण, मास्क, सॅनिटायजर इत्यादी साहित्य कसे घ्यावे हा आर्थिक प्रश्न शाळेसमोर असून या सर्व विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर जुलै पासून ऑनलाइन तर १५ जुलै नंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला असून तसे निवेदन संघातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) देण्यात आले आहे. सभेला प्राचार्य अनिल मंत्री, भाऊराव पत्रे, किशोर शंभरकर, मधुसूदन अग्रवाल, दिलीप चाटोरे, व्ही.टी. पटले, वैद्य, के. सी. शहारे, मनोज भुरे, कोल्हारे, प्राचार्या बेग , ए. टी. डुंबरे, मेंढे, टेंभुर्णीकर, टी. एस. गौतम, हेमंत पटले, जीवानी, वासनिक, व्ही. डी. मेश्राम, दिलीप टेंभरे आदि उपस्थित होते.पालकांमध्येही जुलैनंतरचा सुरूकोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा या १५ जुलैनंतरच सुरू करण्यात याव्या असा सूर जिल्ह्यातील पालकांमध्ये आहे. पालक समित्यांमध्ये सुध्दा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता आणि कोरोना संक्रमणाला वेळीच आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. शालेय अभ्यासक्रम हा कसा तरी पूर्ण करता येईल. मात्र त्यासाठी शाळा सुरू करण्याकरिता घाई करु नये, असेच मत पालकांचे आहे.

टॅग्स :Schoolशाळा