शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेच्या दृष्टीने १५ जुलैनंतर वर्ग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा १ जुलैपासून सुरु करण्यास विविध अडचणी शासकीय व खाजगी शिक्षण संस्थाचालकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळा केव्हा व कशाप्रकारे सुरू कराव्या यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा ऑनलाईन घेण्यात आली.

ठळक मुद्देशिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना : संघटनेच्या सभेत घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुुनी-मोरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यातही पावसाळा हा आजारांचा काळ असून सर्दी-खोकला व ताप असे आजार बळावतात. अशात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ जुलैपासून इयत्ता ९, १० व १२ वीचे ऑनलाईन वर्ग तर १५ जुलै नंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेने घेतला आहे.संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा १ जुलैपासून सुरु करण्यास विविध अडचणी शासकीय व खाजगी शिक्षण संस्थाचालकांसमोर निर्माण झाल्या आहेत. यामुळे शाळा केव्हा व कशाप्रकारे सुरू कराव्या यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा ऑनलाईन घेण्यात आली. सभेत मानव विकास योजना व महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस अद्याप सुरू न झाल्याने ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण- येणे शक्य होणार नाही. पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्दी, ताप, खोकला असे विविध आजार वाढतील हा गंभीर प्रश्न आहे. संस्थाचालक व शाळा व्यवस्थापन समितीवरच शाळा सुरू करण्यासाठी संपूर्णपणे जबाबदारी टाकने योग्य वाटत नाही. काही मोठ्या शाळांची विद्यार्थी संख्या हजारोंच्या घरात असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य उपाययोजनांचे पालन करणे शक्य होणार नाही. त्यात शाळा सुटल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग कसे बघणार हा गंभीर प्रश्न निर्माण होईल व शाळेसाठी ही फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे.समाज कल्याण विभागांतर्गत वस्तीगृह सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. या सर्व समस्येबाबत पालकांशी चर्चा केल्यानंतर नियम व जबाबदारी घेण्यासाठी पालकांची मानसिकता दिसून येत नाही. ग्रामपंचायतने शाळांचे तात्पुरते निर्जंतुकीकरण करून दिले असले तरी साबण, मास्क, सॅनिटायजर इत्यादी साहित्य कसे घ्यावे हा आर्थिक प्रश्न शाळेसमोर असून या सर्व विषयांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर जुलै पासून ऑनलाइन तर १५ जुलै नंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला असून तसे निवेदन संघातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) देण्यात आले आहे. सभेला प्राचार्य अनिल मंत्री, भाऊराव पत्रे, किशोर शंभरकर, मधुसूदन अग्रवाल, दिलीप चाटोरे, व्ही.टी. पटले, वैद्य, के. सी. शहारे, मनोज भुरे, कोल्हारे, प्राचार्या बेग , ए. टी. डुंबरे, मेंढे, टेंभुर्णीकर, टी. एस. गौतम, हेमंत पटले, जीवानी, वासनिक, व्ही. डी. मेश्राम, दिलीप टेंभरे आदि उपस्थित होते.पालकांमध्येही जुलैनंतरचा सुरूकोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा या १५ जुलैनंतरच सुरू करण्यात याव्या असा सूर जिल्ह्यातील पालकांमध्ये आहे. पालक समित्यांमध्ये सुध्दा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता आणि कोरोना संक्रमणाला वेळीच आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. शालेय अभ्यासक्रम हा कसा तरी पूर्ण करता येईल. मात्र त्यासाठी शाळा सुरू करण्याकरिता घाई करु नये, असेच मत पालकांचे आहे.

टॅग्स :Schoolशाळा