शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ठरला अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:50 IST

सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात घसरण : जागेच्या शोधात प्रकल्प रखडला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले. तिथेच शहराची रँकींग घसल्याची माहिती आहे. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच कारणीभूत ठरल्याची माहिती आहे.स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर परिषदांना विविध प्रकारचे मुद्दे ठरवून देत त्यावर गुणांकन केले जाते. स्वच्छ सर्वेक्षण असल्याने घनकचरा व्यवस्थापन ही बाब मुख्य राहणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशात शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन कुठे व कसे केले जाते हा विषय येणार होताच. मात्र नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणात हीच बाब कमकुवत ठरली व नेमके येथेच कमी गुण पडल्याची माहिती आहे. मागील वर्षी केंद्रात ७६ व राज्यात १७ व्या क्र मांकावर असलेले गोंदिया शहर यंदा घसरले असून केंद्रात १२९ तर राज्यात ३५ व्या क्रमांकावर आले आहे.गोंदिया नगर परिषदेची स्थापना १९१९ मध्ये झाली. म्हणजेच, आता शंभरीत असलेल्या गोंदिया नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसणे ही आश्चर्यजनक व तेवढीच संतापजनक आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी नगर परिषदेने जागा शोधली मात्र तेथे काही ना काही अडचण येत असल्याने प्रकल्प रेंगाळत चालला आहे. परिणामी आजपर्यंत नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभे झाले नाही. मात्र यासाठी १०० वर्षांचा काळ लागणे हे काही संयुक्तीक वाटत नाही.अखेर त्याचा फटका नगर परिषदेला बसत आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नगर परिषदेला डच्चू मिळालाच. जिल्ह्यातील लहान लहान नगर पंचायती सुध्दा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारत असताना गोंदिया नगर परिषद यात मागे पडणे हा सुध्दा आश्चर्याचा विषय आहे.संबधित अभियंत्याचा मोबाईल नेहमीच बंदस्वच्छ सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आलेल्या संबंधित अभियंत्याला कोणतीही माहिती मागण्यासाठी मोबाईलवर संपर्क केल्यास त्यांना मोबाईल नेहमीच बंद राहतो. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या विषयाला घेऊन काय सुरू आहे जाणून घेणे कठीण झाले आहे. मोबाईल बंद ठेवण्याच्या या सवयीमुळे नागरिकांसह खुद्द नगर परिषद अधिकारीही वैतागले आहेत. मुख्याधिकारी सुद्धा ही बाब जाणून आहेत. मात्र आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही हा सवाल मात्र गुलदस्त्यात आहे.प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेनगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व्हावा यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या पुढाकाराने ग्राम रतनारा येथे जागा पाहण्यात आली आहे. मात्र त्या जागेसाठी लागणाºया विविध परवानगींसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे. यावर जिल्हाधिकाºयांनी एक समिती तयार केल्याची माहिती प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडून मिळाली.मात्र आता त्यावर लवकरच कारवाई होणे अपेक्षीत असून असे झाल्यास लवकरच प्रकल्प उभारता येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.