शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ठरला अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:50 IST

सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात घसरण : जागेच्या शोधात प्रकल्प रखडला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले. तिथेच शहराची रँकींग घसल्याची माहिती आहे. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच कारणीभूत ठरल्याची माहिती आहे.स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर परिषदांना विविध प्रकारचे मुद्दे ठरवून देत त्यावर गुणांकन केले जाते. स्वच्छ सर्वेक्षण असल्याने घनकचरा व्यवस्थापन ही बाब मुख्य राहणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशात शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन कुठे व कसे केले जाते हा विषय येणार होताच. मात्र नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणात हीच बाब कमकुवत ठरली व नेमके येथेच कमी गुण पडल्याची माहिती आहे. मागील वर्षी केंद्रात ७६ व राज्यात १७ व्या क्र मांकावर असलेले गोंदिया शहर यंदा घसरले असून केंद्रात १२९ तर राज्यात ३५ व्या क्रमांकावर आले आहे.गोंदिया नगर परिषदेची स्थापना १९१९ मध्ये झाली. म्हणजेच, आता शंभरीत असलेल्या गोंदिया नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसणे ही आश्चर्यजनक व तेवढीच संतापजनक आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी नगर परिषदेने जागा शोधली मात्र तेथे काही ना काही अडचण येत असल्याने प्रकल्प रेंगाळत चालला आहे. परिणामी आजपर्यंत नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभे झाले नाही. मात्र यासाठी १०० वर्षांचा काळ लागणे हे काही संयुक्तीक वाटत नाही.अखेर त्याचा फटका नगर परिषदेला बसत आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नगर परिषदेला डच्चू मिळालाच. जिल्ह्यातील लहान लहान नगर पंचायती सुध्दा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारत असताना गोंदिया नगर परिषद यात मागे पडणे हा सुध्दा आश्चर्याचा विषय आहे.संबधित अभियंत्याचा मोबाईल नेहमीच बंदस्वच्छ सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आलेल्या संबंधित अभियंत्याला कोणतीही माहिती मागण्यासाठी मोबाईलवर संपर्क केल्यास त्यांना मोबाईल नेहमीच बंद राहतो. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या विषयाला घेऊन काय सुरू आहे जाणून घेणे कठीण झाले आहे. मोबाईल बंद ठेवण्याच्या या सवयीमुळे नागरिकांसह खुद्द नगर परिषद अधिकारीही वैतागले आहेत. मुख्याधिकारी सुद्धा ही बाब जाणून आहेत. मात्र आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही हा सवाल मात्र गुलदस्त्यात आहे.प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेनगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व्हावा यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या पुढाकाराने ग्राम रतनारा येथे जागा पाहण्यात आली आहे. मात्र त्या जागेसाठी लागणाºया विविध परवानगींसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे. यावर जिल्हाधिकाºयांनी एक समिती तयार केल्याची माहिती प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडून मिळाली.मात्र आता त्यावर लवकरच कारवाई होणे अपेक्षीत असून असे झाल्यास लवकरच प्रकल्प उभारता येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.