शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

केशोरी बायपास रस्ता निर्मितीचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:28 IST

केशोरी : येथून तालुक्याला जाणारा मुख्य रस्ता गावाच्या माध्यमातून जात असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाटी-दाटीने घरे असल्यामुळे जड ...

केशोरी : येथून तालुक्याला जाणारा मुख्य रस्ता गावाच्या माध्यमातून जात असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाटी-दाटीने घरे असल्यामुळे जड वाहने, परिवहन मंडळाची बस जाण्यासाठी अडचण लक्षात घेऊन पर्यायी रस्ता म्हणून बायपास रस्ता सात वर्षांपूर्वी मंजूर करून रस्ता निर्मितीच्या कामाचे भूमिपूजनही आटोपण्यात आले. परंतु अद्यापही या बायपास रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे केशोरी बायपास रस्ता निर्मितीचे भिजत घोंगडे कायम आहे. बायपास रस्ता त्वरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या परिसरातील नागरिकांना तालुका अर्जुनी-मोरगाव येथे जाण्यासाठी मुख्य रस्ता हा केशोरीच्या मध्य भागातून जात आहे. या रस्त्याने जाताना नेहमीच वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. जड वाहनाशिवाय परिवहन मंडळाची बससुद्धा याच रस्त्याने धावत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना पायी चालणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन या रस्त्यस्ला पर्यायी रस्ता म्हणून केशोरी गावाबाहेरून तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नाने बायपास रस्ता जिल्हा प्रशासनाने मंजूर केला. या रस्त्याच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून अधिग्रहित होणारे जमिनीचे मूल्यांकन शासकीय दराप्रमाणे करून मोबदला निश्चित करण्याची प्रक्रिया आटोपण्यात आली होती.

.....

भूमिपूजन होऊन लोटला सात वर्षांचा कालावधी

मागील विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी घाई-घाईने आपण मंजूर केलेल्या कामाचे दुसऱ्या कोणी प्रतिनिधीने भूमिपूजन करू नये या हेतूने तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या बायपास रस्ता निर्मितीच्या कामाचे भूमिपूजन केले. आता भूमिपूजन होऊन सात वर्षांचा कालावधी संपुष्टात येत आहे. परंतु अजूृनही या रस्त्याच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे. लोकप्रतीनिधींच्या दुर्लक्षित धोरणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.