शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कामांमध्ये येतोय स्मार्टफोनचा व्यत्यय

By admin | Published: January 15, 2015 10:55 PM

सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात.

गोंदिया : सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामात व्यत्यय येत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत आहे.वैयक्तिक कारणांसाठी कामाच्या वेळेत होत असलेल्या सोशल मीडिया वापराचा कामावर, त्या संस्थेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे तसेच त्या व्यक्तीची क्रयशक्ती घटत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले. शहरातील सरकारी कार्यालयांमध्येही स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे नागरिकांच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याचे दररोजच्या चित्रातून दिसून येते. फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा वापर आज विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच करताना दिसतात. यात तरूणवर्ग व महिलाही मोठ्या संख्येत आहेत. स्मार्टफोनमधील नवीन अ‍ॅप्स वापरता येत नाही असे क्वचितच सापडतील. स्मार्टफोन महत्त्वाचे आणि आपल्या दैनंदिन कामात येणारे साधन बनले असले तरी याच स्मार्टफोनमुळे नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई येत असल्याचे चित्र आहे. हेच कारण आहे की, शहरातील सरकारी कार्यालयांत काम करणारे कर्मचारीही सोशल मीडियापासून स्वत:चा बचाव करू शकलेले नाहीत. जवळपास ७० टक्के कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन आहेत. सोशल मीडियावर स्मार्टफोनच्या माध्यमातून अपडेट राहणे सहज शक्य होते. विविध कार्यालयांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत स्मार्टफोनचा वापर करताना आढळत असल्याने कार्यालयीन वेळेचा उपयोग खासगी कामांसाठी करणे किती योग्य आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)