शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
3
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
4
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
5
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
7
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
8
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
9
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
10
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
11
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
12
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
13
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
15
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
16
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
17
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
18
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
19
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
20
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

साहेब आम्हाला पायाभूत सुविधा केव्हा मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:18 AM

सडक अर्जुनी : शासन आणि प्रशासन एकीकडे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करीत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातच दिव्याखालीच अंधार असल्याचे ...

सडक अर्जुनी : शासन आणि प्रशासन एकीकडे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करीत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातच दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील मुशानझोरवा गावातील नागरिकांना अद्यापही पायाभूत सुविधापासून वंचित आहेत. ना रस्ते, ना पायभूत सुविधा नसल्याने येथील गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील गावकऱ्यांच्या समस्यांची शासन आणि प्रशासनाने सुध्दा दखल घेतली नसल्याने येथील गावकरी साहेब आम्हाला पायाभूत सुविधा केव्हा मिळणार असा सवाल करीत आहे.

गाव तिथे रस्ता, गाव तिथे शाळा हा शासनाचा नारा असला तरी यापासून मात्र मुशानझोरवावासीय अद्यापही वंचित आहेत. सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत खडकी गट ग्रामपंचायत येणाऱ्या मुशानझोरवा गावात अद्यापही पक्के रस्ते तयार करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गावकऱ्यांना चिखलातूनच मार्ग काढावा लागतो. हे गाव जंगल व्याप्त असल्याने पक्क्या रस्त्याअभावी गावकऱ्यांना तीन किमीचे अंतर चिखलातून पार करावे लागते. तर या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पायवाट शोधावी लागते. या गावात अद्यापही अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे चिमुकले अंगणवाडीत जाण्यापासून वंचित आहेत. हे गाव जंगलव्याप्त असल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी सुध्दा या गावाला भेट देत नसल्याने गावकऱ्यांना आरोग्यविषयक सोयी सुविधांपासून दूर राहावे लागत आहे. गावात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला मात्र त्याची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही.

............

शेती आणि पशुपालनावर उदरनिर्वाह

मुशानझोरवा गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असून शेतीला जोडधंदा म्हणून गावकऱ्यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. यावरच येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने येथील गावकऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास गावकऱ्यांचा विकास होऊ शकतो.

...........

विद्यार्थ्यांची पायपीट

मुशानझोरवा येथे चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना देवरी,गोंदिया ,साकोली ,नागपूर येथे जावे लागते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावात दहावीपर्यंत शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना मदत होऊन त्यांना करावी लागणारी पायपीटसुध्दा थांबू शकते.

................

पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी

मुशानझोरवा येथील पिण्याची समस्या अलीकडेच मार्गी लावण्यात आली. सौरऊर्जेवर चालणारे पंप लावण्यात आले. त्यामुळे येथील गावकऱ्यांची समस्या मार्गी लागली आहे. मात्र इतर समस्या कायम आहेत.