शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

ग्रामसेवकांचा जिल्हा परिषदवर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:20 AM

ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले .....

ठळक मुद्देप्रश्नांकडे वेधले लक्ष : १५०० ग्रामसेवकांवर प्राणघातक हल्ले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायतच्या नियमीत कामाचा अतिरिक्त बोझा ग्रामसेवकांवर आहे. अतिरिक्त ताण, आर्थिक पिळवणूकीमुळे राज्यातील ५० ग्रामसेवकांनी मागील दोन वर्षात आत्महत्या केल्या. कामाच्या तणावात असताना ग्रामसेवकांचे झालेले अपघात व काही नागरिकांकडून १५०० ग्रामसेवकांवर झालेले प्राणघातक हल्ले याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्त्वात बुधवारी (दि.२४) जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढण्यात आला.ग्रामीण जनतेशी निगडीत कामे करताना ग्रामसेवकांना बऱ्याच तणावात राहावे लागते. गाव पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, वॉयरमन, ग्रामविकास सोसायटीचे सचिव, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक हे घटक असतानाही त्यांची कामे ग्रामसेवकांकडे सोपविली जातात. कर्जमाफी फार्म भरणे, कर्जासंबधी ग्रामसभा, बोंडअळीचे पंचनामे, घर विद्युत सर्वेक्षण, कृषी पिक विमा, पीक कापणी प्रयोग, मतदार याद्या सर्वेक्षण, पाणलोटाची कामे, नवीन वाळू धोरण, स्वच्छ भारत मिशन, महसूल विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना, बोगस रेशनकार्ड मोहीम अशी विविध कामे दिली जातात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव, विना चौकशी, विना नोटीसाने निलंबित केले जाते. वेतनवाढ बंद करणे, विना पगारी करणे, यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामसेवकांचे कुणीही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मूक मोर्चा काढून त्यांच्या समस्यांकडे शासन आणि प्रशासाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्याच्या गोंदूर येथील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, सचिव दयानंद फटींग, मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, उपाध्यक्ष सचिन कुथे, कविता बागडे,, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमईवार, परमेश्वर नेवारे, योगेश रूद्रकार, पांडुरंग हरिणखेडे, धर्मेंद्र पारधी, ओ.जी. बिसेन, रितेश शहारे, तारेश कुबडे यांनी केले.