शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एसटीच्या रातराणीला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST

गोंदिया : सुरक्षित व भरवशाचा प्रवास म्हणून नागरिकांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर दृढ विश्वास आहे. यामुळेच रेल्वेनंतर एसटीच्या लालपरीलाच ...

गोंदिया : सुरक्षित व भरवशाचा प्रवास म्हणून नागरिकांचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर दृढ विश्वास आहे. यामुळेच रेल्वेनंतर एसटीच्या लालपरीलाच नागरिक प्रवासासाठी प्राथमिकता देतात. एसटीच्या या प्रवासात लालपरी व शिवशाही प्रवाशांच्या सेवेत सज्ज असतानाच रातराणीसुद्धा प्रवासी सेवेत असते. विभागात फक्त गोंदिया आगाराला १ रातराणी देण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब आहे. आगाराची ही रातराणी सोमवारपासून (दि.१४) प्रवाशांच्या सेवेत पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. गोंदिया ते नांदेड धावणारी ही रातराणी नागपूर मार्गे धावत असल्याने या गाडीला नागपूरपर्यंत प्रतिसाद मिळतो. दररोज दुपारी २.३०ला ही गाडी सुटत असून, अल्प प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, नागपूरपर्यंत प्रवासी असतात; मात्र त्यानंतर पुढे व थेट नांदेडपर्यंत प्रवाशांची संख्या मोजकीच असते. म्हणूनच विभागात एकमेव असलेल्या या रातराणीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.

----------------------------

जिल्ह्यात सध्या एसटीच्या किती फेऱ्या सुरू आहेत- १२५

रातराणी किती- १

वाहक-२

चालक-२

-----------------------------

नागपूर मार्गावर धावते रातराणी

विभागात गोंदिया आगारालाच १ रातराणी देण्यात आली आहे. ती गाडी नागपूरमार्गे नांदेडपर्यंत धावते. गोंदिया ते नागपूर मार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, या मार्गासाठी रेल्वे व बसेसच्या दिवसभर फेऱ्या आहेत. शिक्षण, उपचार, खरेदी, शासकीय कामकाजाशिवाय अपडाऊन करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नागपूर मार्गावर रेल्वे व एसटीलाही चांगला प्रतिसाद आहे. दिवसभर गाड्यांची सोय असल्याने आरक्षणाची गरज पडत नाही, हे विशेष.

--------------------------------------

बालाघाट मार्गावर ट्रॅव्हल्सचा डल्ला

गोंदिया जिल्हा हावडा-मुुंबई रेल्वे मार्गावर असल्याने येथून रेल्वे व बसेसच्या दिवसभर फेऱ्या उपलब्ध आहेत. परिणामी, नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याची गरज पडत नाही; मात्र लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे प्रवासासाठी एसटीच्या फेऱ्या कमी असून, खासगी ट्रॅव्हल्सने या मार्गावर डल्ला मारला आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस येथून सतत धावत असल्याने बालाघाट मार्गावर एसटीला फटका बसत आहे. याशिवाय मात्र एसटी व रेल्वेच्या दिवसभर गाड्या असल्याने खासगी ट्रॅव्हल्स तेथे मधात पडत नाहीत.

---------------------------------

अवघ्या विभागात फक्त गोंदिया आगारालाच १ रातराणी देण्यात आली आहे. ही गाडी नांदेडपर्यंत धावत असून, नागपूरमार्गे जात असल्याने नागपूरपर्यंत काही प्रवासी असतात. जिल्ह्यातील नागपूर मार्ग सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असून, आगाराच्याही दिवसभर फेऱ्या आहेत. त्यामुळे रातराणीला अल्प प्रतिसाद असतो; मात्र प्रवाशांच्या सुविधेसाठी रातराणी नेहमी सज्ज आहे.

- संजना पटले

आगारप्रमुख, गोंदिया.