शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून बियाणं पेरलं, बनावट निघालं; गोंदियातील ३५ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:51 IST

अनियमितता आढळल्याचा ठपका : जिल्ह्यात नऊ भरारी पथकांचे गठन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पथके गठित केली आहेत. तसेच २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली असता सन २०२५ या वर्षात अनियमितता आढळल्याने ३५ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्षसाठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, आदी कारणामुळे ३५ कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या गावात कृषी निविष्ठा उपलब्ध व्हावे म्हणून शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्जदारांना परवाना देण्यात आला होता; परंतु कृषी केंद्र संचालकांनी परवान्यात नमूद घर क्रमांकावर कृषी केंद्र उघडले नसून बियाणे, खते व कीटकनाशकाच्या परवान्यावर कोणतेही खरेदी-विक्री न करणे व कोणतेही दस्ताऐवज जतन न केल्याने ३५ कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली.

कुठे तक्रार करावी ?शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास त्वरित जवळील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. तक्रार येताच त्या दिशेने कृषी अधिकारी चौकशी करून संबंधित कंपन्यांविरुद्ध तक्रार करतात. 

रोवणी जोमातपाऊस उशिरा आला असला तरी शेतकरी रोवणीच्या कामात जोमाने लागला आहे. काही लोकांवर दुबार पेरणीचे संकट आले तरी आपली शेती पडीक राहू नये यासाठी महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणीचे काम करून रोवणी सुरू झाली आहे.

यंदा बनावट बियाणांच्या तक्रारी नाहीतयंदा उशिरा पाऊस आल्याने बियाणे पेरणी उशिरा झाली तरी अद्याप बनावट बियाणे असल्याचा ठपका कुणी ठेवला नाही. बियाणे उगवलेच नाही अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली नाही.

"खते, बियाणे खरेदी करताना कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे, त्यावरील नमूद एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची दखल घेऊन बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ नुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल."-निलेश कानवळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेती