शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शाळा तर महागली! त्यातच आता शाळेची बसही महागली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

दहावी आणि बारावीची परीक्षा ही आता आटोपली असून, पहिली ते नववीच्या परीक्षेचे नियोजन शालेयस्तरावर प्रत्येक शाळेत सुरू आहे. कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव शाळेवर पडल्याने शाळेची ही आर्थिक परिस्थिती खालावली. हा तोटा भरून काढण्यासाठी काही शाळांनी शुल्क अधिनियम कायद्यानुसार पुढील वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ केली आहे. त्यातच काही शाळांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे कारण देऊन स्कूल बसचे दरही वाढविले असल्याने पालक आता चिंतेत सापडला आहे.

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील दोन वर्षांत कोविड प्रादुर्भावाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. या दोन वर्षांचा कोरोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे. सर्व शाळा व विद्यार्थी आता नव्या जोमाने शैक्षणिक प्रवाहात सामील झाले आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा ही आता आटोपली असून, पहिली ते नववीच्या परीक्षेचे नियोजन शालेयस्तरावर प्रत्येक शाळेत सुरू आहे. कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव शाळेवर पडल्याने शाळेची ही आर्थिक परिस्थिती खालावली. हा तोटा भरून काढण्यासाठी काही शाळांनी शुल्क अधिनियम कायद्यानुसार पुढील वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ केली आहे. त्यातच काही शाळांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे कारण देऊन स्कूल बसचे दरही वाढविले असल्याने पालक आता चिंतेत सापडला आहे. शिक्षणाचा खर्च आता आवाक्याबाहेर असल्याचे पालकांचे म्हणणे आहे तर या महागाईत शाळेचा खर्च कसा भागवणार ? असा प्रश्न शाळेचा आहे. मात्र खासगी शाळांनी २५ टक्के शुल्क वाढ केल्याने पाल्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

शाळेतील शुल्क तीन हजारापर्यंत वाढविलेn प्रत्येक शाळांनी आपले शैक्षणिक शुल्क निर्धारित केलेले असते. शुल्क अधिनियम कायद्यानुसार दर दोन वर्षांनी १५ टक्के शैक्षणिक शुल्कामध्ये करण्याचे निर्देश आहेत. अनेक शाळांनी कोरोना काळात दोन वर्षांत कोणतीही फी वाढ केलेली नाही तर कोविड प्रादुर्भावामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे अनेक शाळांची फी वसूल झाले नाही, त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्षात ही वाढ अटळ आहे.

शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेरपहिल्यांदाच कोरोनाने नोकरीची वाट लावली. त्यात शाळा बंद होत्या आता शाळा सुरू होऊन परीक्षाही झाल्या मात्र या नवीन सत्रात शाळेने फी वाढवली असल्याने शिक्षणाचा खर्च आटोक्याबाहेर गेला आहे.- श्वेता मस्के, (पालक)

कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळा बंद होत्या तर फी कशी भरणार? तरीही आम्ही फी भरली आहे. आता शैक्षणिक शुल्कात आणि स्कूल बसच्या भाड्यात वाढ झाली तर आम्ही काय करावे? मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. - नीरज गुप्ता, (पालक),

दोन वर्षांपासून कोरोनाने शिक्षण क्षेत्राचे हाल केले. अनेक पालकांनी फी भरली नाही. शिक्षकांचे पगार, पाणी बिल, वीजबिले, स्टेशनरी, शाळेचा पूर्ण खर्च तर करावाच लागला तरीही आम्ही फी वाढविली नाही. शुल्क अधिनियम कायद्यानुसार शाळेला दर दोन वर्षांनी १५ टक्के फी वाढविता येते, त्यावर वाढवायची असेल तर जिल्हास्तरावर कमिटीची परवानगी घ्यावी लागते.- मुकेश अग्रवाल, संस्था अध्यक्ष.

कोरोना काळात अनेक पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरलेले नाही, त्यामुळे शाळेवर भुर्दंड बसला. तरीही ऑनलाइन क्लासेस पूर्ण केले आहेत. फीसाठी जबरदस्ती करण्यात आली नाही. अनेक पालकांकडे मागील वर्षीची फीस बाकी आहे. यावर्षी शैक्षणिक वर्षात फी वाढणार आहे.- अनिल मंत्री, प्राचार्य

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण