शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

शाळांची वेळ बदलणार; पालक, रिक्षा चालकांची अडचण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 17:16 IST

वेळ बदलण्यास पालकांचाही विरोध : दोन सत्रांचे नियोजन कसे करावे?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, शाळेची वेळ बदलल्याने दोन सत्रांत चालविल्या जाणाऱ्या शाळा, नोकरदार पालक व रिक्षा चालकांना अडचणीचे ठरणार आहे. तसेच शाळांनाही दोन सत्रांचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा आता शिक्षण संस्था चालकांसह पालक, शिक्षकांनी विरोध सुरू केला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळेबाबत शिक्षण विभागाला सूचना केली होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून शाळेच्या वेळा बदलण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरविण्याची सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिली आहे. या सूचनेमुळे आता पुढील वर्षाचे नियोजन करताना शाळांना दोन सत्रांत शाळा भरवून, आधीच्या वेळांची अदलाबदल करावी लागणार आहे.

घराच्या एक किमीच्या परिसरात शाळा असेल, तर तेथेच मुलांना शाळा प्रवेश द्यावा. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल व मुलांची पुरेशी झोपही होईल. परंतु, अनेक पालकांची मुले १० ते १२ किलोमीटर अंतरावरील शाळेत जातात. त्यामुळे पालकांची तर ओढाताण होईलच, शिवाय दोन सत्रांमध्ये नियोजन करताना शाळांनाही कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा विचार करावा.- एस. यू. वंजारी, शिक्षणतज्ज्ञ, गोंदिया.

मुलांची झोप होत नाही. हे खरे असले, तरी शाळेची वेळ बदलल्याने प्रश्न सुटणार नाही. शिक्षण विभागाने यातून मध्य काढावा. शाळेची आणि नोकरीची वेळ एकच येत असल्याने मुलांना शाळेत कसे पोहोचवावे? स्कूल बस, ऑटो लावल्यानंतरही तयारीचा प्रश्न कायम राहतो.- ममता शिवणकर, पालक

प्रत्येक शाळेची वेळ वेगवेगळी आहे. काही शाळांमध्ये एक्स्ट्रा तासही घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचविणे शक्य होणार नाही. आम्हालाही विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचताना कसरत करावी लागणार आहे. शिक्षण विभागाने याचा विचार करून पूर्वीप्रमाणे शाळांची वेळ कायम ठेवावी.- गोपाल हरिणखेडे, स्कूल बसचालक

आमची शाळा दोन शिफ्टमध्ये चालते. सकाळी ९ वाजताची वेळ केल्यास दुपारची शाळा केव्हा भरवायची? सकाळी ९ वाजताची शाळा सुरू करण्यास पालक व विद्यार्थ्यांचीही मानसिकता नाही. अनेक शाळा दोन सत्रांत चालतात. त्यामुळे शिक्षण विभागाने ९ वाजताची शाळा करण्याच्या निर्णयावर विचार करावा.- दिनेश राऊत, प्राचार्य, आदर्श विद्यालय आमगाव.

प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षा चालकांना मोठी अडचण होणार आहे. अनेक कुटुंबांतील आई-वडील दोघेही नोकरी करतात. अशा नोकरदारांसमोर शाळेची वेळ व कामावर जाण्याची वेळ एकच येत असल्याने त्यांना मुलांना शाळेत पोहोचवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच शाळाही दोन सत्रांत भरविणे व त्याप्रमाणे नियोजन करणे कठीण होणार आहे.- मिलिंद रंगारी, शिक्षणतज्ज्ञ, गोंदिया. 

टॅग्स :Schoolशाळाgondiya-acगोंदिया