शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

जिल्ह्यात शाळांची घंटा आता ३१ जुलैनंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:01 IST

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे बघता राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. त्यातच जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी वर्ग ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू न करण्याबाबत आदेश काढले. त्यामुळे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा आता पुढील आदेशपर्यंत ठोका वाजणार नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : इयत्ता ९, १० व १२ वीचे आॅनलाईन वर्ग, संसर्ग वाढत असल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे बघता राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. त्यातच जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी वर्ग ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू न करण्याबाबत आदेश काढले. त्यामुळे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा आता पुढील आदेशपर्यंत ठोका वाजणार नाही.कोरोनाने राज्यात हाहाकार माजविला असून सर्वच काही अस्तव्यस्त करून टाकले आहे. यातील उद्योगधंदे आता हळूवार सुरळीत होत असतानाच मात्र शिक्षण क्षेत्रात सर्वच काही विस्कळीत झाले आहे. २६ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू होत असून कोरोनामुळे त्यातही आडकाठी आली. विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होऊ यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. मात्र हा उपक्रम जास्त दिवस चालविता येणार नसल्याने राज्य शासनाने १ जुलैपासून इयत्ता ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार, जिल्ह्यात शिक्षण विभाग सज्ज होते.शिक्षण विभागाकडून सर्व तयारी झालेली असताना राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी झाला नाही. शिवाय कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे सर्व चित्र बघता राज्य शासनाने येत्या ३१ जुलैपासून राज्यातील लॉकडाऊन वाढवून दिले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जून रोजी पहिल्या टप्प्यातील इयत्ता ९, १० व १२ वीच्या शाळा पुढील आदेशापर्यंत सुरू न करण्याचे आदेश दिले.त्यानुसार,शिक्षणाधिकाऱ्यांना बुधवारी (दि.१) यासंदर्भात आदेश काढले आहेत.यामुळे आता पुढील आदेशापर्यंत शाळांचा ठोका वाजणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र असे असताना ऑनलाईन पद्धतीचा वापर करून शैक्षणिक प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी असेही कळविण्यात आले आहे.सुमारे ६५ शाळा सुरू असल्याची माहितीइयत्ता ९, १० व १२ वी या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १ जुलैपासून सुरू होणार असे आदेश असल्याने बुधवारी (दि.१) जिल्ह्यातील ६५ शाळा सुरू झाल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांशी संपर्क साधता आला नसल्याने नेमक्या किती शाळा सुरू झाल्या हे सांगणे कठीण आहे. मात्र तरिही ६५ शाळा सुरू झाल्या व त्यात सुमारे ११३१ विद्यार्थी उपस्थित आहे.निणर्यांने शाळा संचालकांमध्ये संभ्रमशाळांध्ये वर्ग घेण्यास परवानगी नसताना मात्र शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना अशैक्षणिक कामे जसे ई-सामग्री, उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन व निकाल घोषीत करणे आदिंना परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळेतील कोणत्याही प्रकारचे वर्ग सुरू करता येणार नाहीत.विशेष म्हणजे उत्तरपत्रिका तपासणी करु न त्यांचे मुल्याकंन आणि निकाल तयार करण्याचे काम शिक्षक करतात. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात इतर कर्मचाºयांकडून ही कामे करुन घ्यावी असे म्हटले आहे. त्यामुळे शाळा संचालकामध्ये यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा