शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

संततधार पावसाने ३१ तलावांनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 21:07 IST

जिल्ह्यात मागील तीन दिवस बरसलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर मध्यम प्रकल्पाचे ३१ तलाव शंभर टक्के भरले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक तलाव ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देबहुतेक तलाव ओव्हर फ्लोच्या मार्गावर : धरणातील पाणीसाठ्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस बरसलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर मध्यम प्रकल्पाचे ३१ तलाव शंभर टक्के भरले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक तलाव ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी बऱ्याच गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने पुजारीटोला धरणातून पाणी सोडून जिल्हावासीयांची तहान भागविण्याची वेळ आली होती. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला असून सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पाणी टंचाईचे संकट सुध्दा काही प्रमाणात कमी झाले आहे. शंभर टक्के भरलेल्या मध्यम प्रकल्पामध्ये बोदलकला, संग्रामपुर व कटंगीचा समावेश आहे. लघू प्रकल्पात डोंगरगाव, गुमडोह, कालीमाटी, मोगरा, पांगडी, राजोली, सोनेगाव, जुनेवानी, उमरझरी, बेवारटोला यांचा समावेश आहे. तर जुन्या मालगुजारी तलावात भानपूर, चान्ना-बाक्टी, फुलचूर, गंगेझरी, कवठा, कोहलगाव, खैरी, खमारी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहुरकुडा पळसगाव (सौंदड) पालडोंगरी, पळसगाव (डव्वा) पुतळी, सौंदड व तेढा या तलावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघू व जुने मालगुजारी तलाव जे सिंचन व पिण्याच्या पाण्यायोग्य आहे. त्यांची संख्या ६५ वर आहे. या तलावांत आतापर्यंत ७२.६८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या तलावांत २७.३२ टक्के अधिक पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांतील ९ तलावांमध्ये सध्या ७७.३० टक्के, लघू प्रकल्पाच्या २२ तलावांत ६७.६८ टक्के तर ३८ जुन्या मालगुजारी तलावांत ८१.५४ टक्के पाणीसाठा आहे.काही तलाव अद्यापही अत्यल्प पाणीसाठामागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. मात्र काही तलावातील पाणीसाठ्यात अद्यापही वाढ झालेली नाही. मध्यम प्रकल्पातील चोरखमारा तलावात ३८.१५ टक्के, भदभद्या तलावात ५२.१८ टक्के, रिसाला २९.८४ टक्के, ओवारा ४६.३२ टक्के तर जुन्या मालगुजारी तलावांतील बोपाबोडी २२.७३ टक्के, चिरचाळबांध ४३.६५ टक्के, चिरचाडी तलावात ४९.६२ टक्के, गिरोला ३०.२९ टक्के, कोसबीबकी १७.८८ टक्के, ककोडी ५२.०६ टक्के, खोडशिवनी ३५.०३ टक्के तर निमगाव ५३.२१ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊस