शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

रेतीमाफीयांची पथकाच्या गाडीवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

पर्यावरण विभागाची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीचा अवैध उपसा सुरूच असून दररोज गोंदिया शहरासह इतर भागात रेती भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर दिसून येतात. त्यामुळे रेतीची तस्करी जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतेढवा घाटावरील घटना : रेतीमाफीयांना अभय कुणाचे, पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेती घाटावरुन रेतीचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांच्या वाहनांवर रेतीमाफीयांनी दगडफेक केल्याची घटना गुरूवारी (दि.६) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रेतीमाफीयांचे जिल्ह्यात प्रस्त वाढत असून त्यांच्या वेळीच मुसक्या आवळण्याची गरज आहे.पर्यावरण विभागाची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीचा अवैध उपसा सुरूच असून दररोज गोंदिया शहरासह इतर भागात रेती भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर दिसून येतात. त्यामुळे रेतीची तस्करी जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील तेढवा, काटी, रजेगाव परिसरातील नदीपात्रातून वाळूचा लिलाव झालेला नसतानाही रेतीचा उपसा होत असल्याचे प्रमाण वाढल्याने गोंदिया नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात बुधवारच्या (दि.१०) रात्रीपासून भरारी पथकाने गस्त घालण्यास सुरवात केली. या पथकात तलाठी हटवार, बुचे, भोयर आदींचा समावेश होता. रेती घाटांच्या परिसरात गस्त घालत असताना गुरुवारी (दि.११) सकाळी ६ वाजताच्या सुमारास काटी परिसरातून ३ ट्रॅक्टर हे तेढवा घाटातून वाळूची वाहतूक करताना पकडले.त्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर तेढवा येथील घाटावर पथक पोचताच नदीपात्रात असलेल्या ट्रॅक्टर व टिप्परमधील चालक हमाल पळून गेले. त्यानंतर तेथील साहित्य जप्त करुन तलाठी हे वाहनात ठेवत असतानाच हमालांनी व चालकांनी पथकातील अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. यात एका वाहनाचे काचा फोडल्या. तसेच तलाठ्याला सुध्दा मारहाण करण्यास धावले. दरम्यान तलाठ्याने यातून कशी बशी आपली सुटका करुन घेत काटी गावाकडे धाव घेतली. दरम्यान पकडलेले ट्रॅक्टर रावणवाडी पोलीस स्टेशनला आणत असताना ट्रॅक्टर मालकाने त्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. रेतीमाफीयांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून महसूल कर्मचाºयांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे रेतीमाफीयांची हिम्मत नेमकी कशामुळे वाढत आहे. त्यांना नेमके अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळण्याची गरजजिल्ह्यातील सर्वच रेती घाटांवरुन दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. ही बाब आता लपून राहिलेली नाही. रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी दररोज तीन चार गुन्हे दाखल केले जात आहे. काही ठिकाणी रेतीचा अवैध उपसा होत असताना त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे रेतीमाफीयांची हिम्मत वाढत चालली असून त्यांच्या वेळीच मुसक्या आवळ्याची गरज आहे.मोठ्या रेती घाटांवर २४ तास पथकाची गरजतिरोडा आणि गोंदिया तालुक्यात मोठे रेती घाट आहेत. सर्वाधिक रेतीमाफीये याच भागात सक्रीय आहे. त्यामुळे रेतीच्या अवैध उत्खनन टाळण्यासाठी या ठिकाणी २४ भरारी पथकाची नियुक्ती करण्याची गरज आहे. शिवाय रेती घाटाच्या परिसरात सीसीटीव्ही लावून आणि पोलीस बंदोबस्त ठेवल्यास रेती तस्करांचे मुसक्या आवळणे शक्य होईल.

मोठ्यांना सूट लहानांवर कारवाई४जिल्ह्यात रेतीमाफीयांचे प्रस्त दिवसेंदिवस वाढत आहे. या रेतीमाफीयांना राजकीय वरदहस्त असल्याची बाब सुध्दा आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या रेतीमाफीयांवर कारवाई करण्याचे टाळून लहानांवर कारवाई केली जात असल्याचे चित्र बरेचदा जिल्ह्यात पाहयला मिळाले. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे.