शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

जिल्ह्यातील भाजीपाला,मका,टरबूज उत्पादक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देहमीभाव केंद्राचा अभाव : शेतातच सडला शेतमाल, शेतकऱ्यांची सर्वच बाजूने कोंडी

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील जवळपास दीड महिन्यापासून ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी आहे. या ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील भाजीपाला,मका व टरबूज उत्पादकांना बसला असून भाजीपाला आणि टरबूजची विक्री न करता आल्याने त्यांच्या शेतातच हा माल सडला. परिणामी शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च भरुन न निघाल्याने त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. आधीच कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी होवून पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव या भागातील शेतकऱ्यांनी चारपैसे शिल्लक पडावे व जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी टरबुजची वाडी लावली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली. सुदैवाने यंदा या सर्वांना पिकांना अनुकुल वातावरण मिळाल्याने त्यांची चांगली वाढ झाली.दरवर्षी लग्नसराईच्या काळात भाजीपाल्यासह काकडीची सुद्धा मोठी मागणी असते. उन्हाळ्याचे ४ महिने टरबूज व डांगरांंची सुद्धा मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपानंतर कुटुंबासह शेतात राबून आणि रक्ताचे पाणी करुन या पिकांची शेती केली. यंदा भाजीपाला, टरबूज व मक्याचे पीक सुद्धा चांगले आले होते. त्यामुळे चार पैसे नक्कीच शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र या सर्वावर ‘लॉकडाऊन’मुळे पाणी फेरल्या गेले. चारपैसे शिल्लक राहणे दूरच राहिले लागवडीसाठी लावलेले पैसे निघाले नाही. सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकरी २०० एकरवर टरबुजाची लागवड करतात. तर काकडीसह भाजीपाला पिकाची जवळपास ५०० एकरवर लागवड केली. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने काकडीला मागणीच नाही. परिणामी ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. एकीकडे नैसर्गिक संकटाला तोंड देत असताना कोरोनामुळे करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. परिणामी आता खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी ही चिंता सतावित असल्याचे सडक-अर्जुनी तालुक्यातील भागवत चुटे, सुरेश मेश्राम, मोरेश्वर चुटे या शेतकऱ्यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सोन्यासारखे पीक मातीमोल होत असल्याचे पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू आले. एकंदरीत ‘लॉकडाऊन’मुळे सर्वाधिक नुकसान भाजीपाला व टरबूज उत्पादकांचे झाले आहे.दोन हजार रुपये क्विंटलचा भाव ७०० रुपयांवरअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड होती. सुदैवाने हे पीक सुद्धा चांगले असून ते आता शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. मात्र अद्यापही हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापारी मक्याची अंत्यत कमी दराने खरेदी करीत आहे. मागील वर्षी मका हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १७५० ते दोन हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळाला होता. मात्र यंदा ‘लॉकडाऊन’मुळे शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना ७००-८०० रुपये प्रती क्विंटल दराने मका विक्री करण्याची वेळ आली आहे.धान घरातच पडूनदेशात सर्वत्र २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल धान घरात तसाच पडून आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता त्यांना सतावित आहे.कोकणा परिसरात माझ्यासह अन्य शेतकऱ्यांनी २०० एकरवर टरबूज व डांगराची लागवड केली होती. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे मालाची वाहतूक आणि विक्री करता न आल्याने सर्व टरबूज शेताच पडून राहिल्याने सडले. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देखील नुकसान झाले.- शिवाजी गहाणे, कोकणा (टरबूज उत्पादक शेतकरी)मी ५ एकरवर काकडीची लागवड केली होती. सुदैवाने यंदा काकडीचे पीक चांगले आले होते. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे काकडीला मागणी नसल्याने व वाहतुकीची अडचण आल्याने ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. त्यामुळे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.- लहू डोंगरवार, रेंगेपार, (काकडी उत्पादक शेतकरी)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी