शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील भाजीपाला,मका,टरबूज उत्पादक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देहमीभाव केंद्राचा अभाव : शेतातच सडला शेतमाल, शेतकऱ्यांची सर्वच बाजूने कोंडी

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील जवळपास दीड महिन्यापासून ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी आहे. या ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील भाजीपाला,मका व टरबूज उत्पादकांना बसला असून भाजीपाला आणि टरबूजची विक्री न करता आल्याने त्यांच्या शेतातच हा माल सडला. परिणामी शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च भरुन न निघाल्याने त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. आधीच कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी होवून पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.‘लॉकडाऊन’मुळे सर्वच उद्योगधंदे आणि वाहतुकीची साधने ठप्प होती. याचा फटका व्यावसायीक व यावर अवलंबून असणाºयांना बसलाच. मात्र सर्वाधिक कोंडी आणि नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे. मागील २-३ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. त्यांच्या नशिबी कधी गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव सातत्याने येत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव या भागातील शेतकऱ्यांनी चारपैसे शिल्लक पडावे व जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी टरबुजची वाडी लावली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली. सुदैवाने यंदा या सर्वांना पिकांना अनुकुल वातावरण मिळाल्याने त्यांची चांगली वाढ झाली.दरवर्षी लग्नसराईच्या काळात भाजीपाल्यासह काकडीची सुद्धा मोठी मागणी असते. उन्हाळ्याचे ४ महिने टरबूज व डांगरांंची सुद्धा मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपानंतर कुटुंबासह शेतात राबून आणि रक्ताचे पाणी करुन या पिकांची शेती केली. यंदा भाजीपाला, टरबूज व मक्याचे पीक सुद्धा चांगले आले होते. त्यामुळे चार पैसे नक्कीच शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र या सर्वावर ‘लॉकडाऊन’मुळे पाणी फेरल्या गेले. चारपैसे शिल्लक राहणे दूरच राहिले लागवडीसाठी लावलेले पैसे निघाले नाही. सडक-अर्जुनी तालुक्यातील शेतकरी २०० एकरवर टरबुजाची लागवड करतात. तर काकडीसह भाजीपाला पिकाची जवळपास ५०० एकरवर लागवड केली. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने काकडीला मागणीच नाही. परिणामी ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. एकीकडे नैसर्गिक संकटाला तोंड देत असताना कोरोनामुळे करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. परिणामी आता खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी ही चिंता सतावित असल्याचे सडक-अर्जुनी तालुक्यातील भागवत चुटे, सुरेश मेश्राम, मोरेश्वर चुटे या शेतकऱ्यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सोन्यासारखे पीक मातीमोल होत असल्याचे पाहून शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू आले. एकंदरीत ‘लॉकडाऊन’मुळे सर्वाधिक नुकसान भाजीपाला व टरबूज उत्पादकांचे झाले आहे.दोन हजार रुपये क्विंटलचा भाव ७०० रुपयांवरअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा १ हजार हेक्टरवर मक्याची लागवड होती. सुदैवाने हे पीक सुद्धा चांगले असून ते आता शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. मात्र अद्यापही हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापारी मक्याची अंत्यत कमी दराने खरेदी करीत आहे. मागील वर्षी मका हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १७५० ते दोन हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव मिळाला होता. मात्र यंदा ‘लॉकडाऊन’मुळे शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना ७००-८०० रुपये प्रती क्विंटल दराने मका विक्री करण्याची वेळ आली आहे.धान घरातच पडूनदेशात सर्वत्र २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल धान घरात तसाच पडून आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम कसा करावा अशी चिंता त्यांना सतावित आहे.कोकणा परिसरात माझ्यासह अन्य शेतकऱ्यांनी २०० एकरवर टरबूज व डांगराची लागवड केली होती. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे मालाची वाहतूक आणि विक्री करता न आल्याने सर्व टरबूज शेताच पडून राहिल्याने सडले. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देखील नुकसान झाले.- शिवाजी गहाणे, कोकणा (टरबूज उत्पादक शेतकरी)मी ५ एकरवर काकडीची लागवड केली होती. सुदैवाने यंदा काकडीचे पीक चांगले आले होते. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे काकडीला मागणी नसल्याने व वाहतुकीची अडचण आल्याने ५ एकरातील काकडी शेतातच वाळली. त्यामुळे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.- लहू डोंगरवार, रेंगेपार, (काकडी उत्पादक शेतकरी)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी