शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परतीच्या पावसाने १९ हजार हेक्टरमधील धानपीक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे १९ हजार ३८७ हेक्टरमधील धानपिकाचे ३३ टक्के पेक्षा ...

ठळक मुद्दे३३ हजार शेतकऱ्यांना फटका : ३३ टक्केच्यावर नुकसान, पंचनामे पूर्ण, अहवाल शासनाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे १९ हजार ३८७ हेक्टरमधील धानपिकाचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. परिणामी याचा फटका जिल्ह्यातील ३२ हजार ७९८ शेतकऱ्यांना बसला असून या संबंधिचा अहवाल कृषी व महसूल विभागाने शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून आता शासनाकडून नुकसान भरपाईसाठी कोणता निकष लावला जातो याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली. सुरूवातीला पाऊस लांबल्याने पेरण्या आणि परिणामी रोवण्या खोळंबल्या होत्या. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाल्याने आणि पावसाने सरासरी गाठल्याने धानपिकांना संजीवनी मिळाली. धानपिकाला अनुकुल वातावरण मिळाल्याने धानपिकाची चांगली वाढ झाली. त्यामुळे यंदा खरीपातील धानाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने ५० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त करीत नियोजन केले होते. मात्र ऐन हलके धान निघण्याच्या मार्गावर असताना आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास १० हजार हेक्टरमधील धानाची कापणी पूर्ण झाली होती. कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून होता. दरम्यान परतीच्या पाऊस जोरदार बरसल्याने धानाच्या कडपा ओल्या होऊन काही प्रमाणात धानाला अंकुर फुटले तर मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला. काही शेतकºयांना तर केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले आहे.त्यामुळे शेतकºयांच्या तोंडचा घास परतीच्या पावसाने हिरावून नेल्याने शेतकºयांना पुन्हा अस्मानी संकटाला तोंड देण्याची वेळ आली. परतीच्या पावसाने धान पिकांचे नुकसान झाल्याची शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण केले.यात १९ हजार ३८७ हेक्टरमधील धान पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असून यामुळे ३२ हजार ७९८ शेतकरी बाधीत झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे बुधवारी पाठविल्याची माहिती आहे.पीक विमा कंपनीची माहिती गुलदस्त्यातजिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ७० हजारावर शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला. परतीच्या पावसामुळे धानपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विमाधारक शेतकºयांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले. मात्र या अर्जांची माहिती देण्यास आणि किती शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र ठरु शकतील याची माहिती पीक विमा कंपनीने गुलदस्त्यात ठेवल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.नुकसानीकडे लागले लक्षराज्यात सध्या राष्टÑपती राजवट लागू असल्याने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासंदर्भात निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कृषी आणि महसूल विभागाने युध्द पातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर केला असला तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.नुकसानीचा निकष काय?पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक धानपिकांचे नुकसान झाले असल्यास असे शेतकरी नुकसान भरपाई पात्र ठरतात. मात्र ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही त्या शेतकºयांना नुकसान भरपाई देतांना शासन नेमका कोणता निकष लावते, हेक्टरी किती रुपये नुकसान भरपाई जाहीर करते याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agricultureशेती