शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सेवानिवृत्त अंशदायी कर्मचाऱ्यांना मिळते ‘शून्य पेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:26 IST

शासकीय कर्मचाऱ्यांवर लादलेल्या परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेविषयी शासनातर्फे मोठमोठ्या थापा मारल्या जात असल्यातरी आता या योजनेचे पितळ उघडे पडत आहे.जिल्ह्यात अंशदायी पेन्शन योजनेतून सेवानिृवत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘शून्य पेन्शन’ मिळत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शासकीय कर्मचाऱ्यांवर लादलेल्या परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेविषयी शासनातर्फे मोठमोठ्या थापा मारल्या जात असल्यातरी आता या योजनेचे पितळ उघडे पडत आहे.जिल्ह्यात अंशदायी पेन्शन योजनेतून सेवानिृवत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘शून्य पेन्शन’ मिळत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.प्राप्त माहितीनुसार, १ नोव्हेंबर ०५ नंतर रुजू शासकीय कर्मचाºयांवर लादलेल्या अंशदायी पेन्शन योजनेतील कर्मचाºयांचे कसे हाल होत आहेत याविषयी लोकमतने व्यथा अंशदायीची या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यात सदर योजनेतील कर्मचाºयांचा मृत्यू झाल्यावर कुटुंबीयांची वणवण प्रकाश झोतात येताच अनेक कर्मचाºयांनी आपल्या व्यथा मांडल्या. या योजनेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप काहीच पेन्शन मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.आमगाव पंचायत समिती अंतर्गत जि.प.प्राथ.शाळा येरमाडा येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक चैतराम हनुजी शहारे यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाकडून एक रुपयाही लाभ मिळालेला नाही. २००२ पासून शासन सेवेत काम करुन २०१८ रोजी सेवानिृवत्त झालेले शहारे यांच्या वेतनातून सुमारे ९० हजार रुपये अंशदायी रुपात कपात करण्यात आली आहे. मात्र आत्तापर्यंत या योजनेत त्यांना पेन्शन मिळालेली नाही.सेवानिवृत्तीनंतर पगार बंद, पेन्शन नाही उलट त्यांच्या खांद्यावर कुटुंबाचा भार म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरुजींना उतारवयात मोलमजुरी करावी लागत आहे. असेच काहीसे वास्तव जिल्ह्यात अंशदायी पेन्शन योजनेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे आहेत.वनक्षेत्र कार्यालय आमगाव येथून २०१४ पासून सेवानिवृत्त झालेल्या अंशदायी कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही. ओंकार ग्यानीराम रहांगडाले यांनी वयाच्या ३५ व्या वर्षापासून वन खात्यात ३०० रुपये महिन्याप्रमाणे काम केले. २०१८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. शासनाकडे त्यांनी वेतनातून सुमारे दीड लाख रुपये कपात केली. पण त्यांचीही पेन्शन शून्य आहे.त्याचप्रमाणे भोजराज रहिले, हरी डोंगरवार,सुदाम बिसेन,सेसराम चौधरी,धानू टेकाम, सेवकराम रहांगडाले, केलन बारेवार यांच्यासह इतर अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीनंतरही पेन्शनपासून वंचित आहेत.अर्थसहाय्य योजनेपेक्षा बिकट स्थितीशासनाच्या अनेक योजनेत जनतेच्या मासिक अर्थसहाय्य मिळते. संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना,अपंग योजना, विधवा पेन्शन योजना अशा अनेक योजनेत दरमहा सहाशे ते एक हजार रुपये पेन्शन देण्यात येते.परंतु आयुष्यभर राबणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याच्या हक्काच्या पेन्शनपासून वंचित ठेवण्यात येत आहे. ही प्रगत महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिका आहे.आम्ही वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज करावा काय? शासन हक्काची पेन्शन बंद करीत असेल तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानी वृद्धापकाळ पेन्शन योजनेसाठी अर्ज करावा काय?- चैतराम शहारे, सेवानिवृत्त अंशदायी कर्मचारी