शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

पक्षी संरक्षणासाठी जलाशय संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 20:58 IST

जलाशयाच्या पर्यावरण व जैवविविधतेवर इतर घटक निर्भर असतात. पण जलाशयांचे पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या अशीच परिस्थती उद्भवली आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोग : जिल्ह्यातील ३० तलावांकडे विशेष लक्ष

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलाशयाच्या पर्यावरण व जैवविविधतेवर इतर घटक निर्भर असतात. पण जलाशयांचे पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या अशीच परिस्थती उद्भवली आहे. सारस आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या या जिल्ह्यातील जलाशयांचे पर्यावरण टिकविण्यासाठी स्वयंसेवकांनी धडपड सुरू केली आहे. त्यातून परसवाडा व लोहारा अशी दोन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली असून हा राज्यातील पहिला प्रयोग ठरला आहे.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकापूर्वी ३० हजारांच्या आसपास जलाशये होती. पण आता काहीच जलाशये शिल्लक राहीली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली असल्यामुळे त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरीत पक्षी आणि सारससाठी प्रसिद्ध होता. पण जलाशयांची गुणवत्ता घसरली आणि या पक्ष्यांची संख्याही कमी झाली. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने या पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. निवडण्यात आलेल्या परसवाडा आणि लोहारा या दोन तलावांकरीता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग, वनविभागाने सहकार्य केले. जलाशयांची स्थिती, त्याची जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण या सर्वांचा अभ्यास सुरू केला. जलाशये टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेतला. या दोन तलावांनंतर जिल्ह्यातील इतर ३० तलावांसाठी त्यांनी समाजाधारीत संवर्धनावर अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि कृती आराखडा तयार केला. यात अशाच गावातील जलाशये निवडण्यात आली, ज्यांना तिथल्या वनस्पती व पक्ष्यांचे ज्ञान आहे. तलाव वाचले तर तर पक्षी वाचतील याचे ज्ञान आहे.जिल्हा प्रशासनाकडे त्या संबंधीचा प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर पुनर्प्रस्ताव मागील मार्च व एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाकडे आहे. सारसांच्या भवितव्याच्या आणि एकूणच गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक व स्थलांतरीत पक्षीवैभव जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रशासन त्या दृष्टीने पावले उचलत आहे. विशेष म्हणजे अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली आणि सलीम अली यांचे वास्तव्य राहीलेल्या आणि सारसांसाठी कधीकाळी प्रसिद्ध नवेगावबांधच्या नवेगाव तलावाचा सुद्धा यात समावेश आहे. मारूती चित्तमपल्ली यांनी अवघे आयुष्य या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी घालविले. आता त्यांचाच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सावन बहेकार, चेतन जसानी, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, अंकीत ठाकूर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे ही ‘सेवा’ ची तरूणाई करीत आहे.जैवविविधता नष्ट होण्याची कारणेजलाशयांमध्ये गेल्या काही वर्षात बेशरम (इकोर्निया) सारख्या बाहेरच्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे जलाशयांची जैवविविधता नष्ट होत आहे. मासेमारी संघटनांना जलाशयावर मासेमारी करण्यासाठी लीज दिली जाते. या जलाशयांमध्ये कोणत्या प्रजातिच्या मास्यांचे आणि किती प्रमाणात, कशा प्रकारे बिज टाकावे जावे यासंबधी नियम आहेत. मात्र प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. त्याचाच फायदा घेत मासेमारी संघटना अधिक उत्पादन आणि व्यापारी दृष्टीकोणातून झटपट वाढणाºया माशांचे बीज टाकतात. त्याचा दुष्परिणाम जलाशयाच्या जैवविविधतेवर होतो. जलाशयाच्या आजूबाजूला असणाºया शेतांमध्ये रासायनिक खते आणि रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. या शेतांमधील पाणी जलाशयात येत असल्याने जलाशयातील पाण्याची गुणवत्ता खराब होते. मग्रारोहयो आणि इतर योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या निधीतून जलाशयांचे खोलीकरण केले जाते. मात्र जलाशयातील जैवविविधतेचा विचार न करता सरसकट खोलीकरण केले जाते. स्थानिक वनस्पती यामुळे नष्ट होतात त्याच्या पुनरूज्जीवनाचा विचार प्रशासन करत नाही.जलाशय नष्ट होण्याची कारणेशासकीय, मालगुजारी तलाव, मध्यम प्रकल्प, खासगी असे जलाशयांचे अनेक प्रकार आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत खासगी जलाशये होती. त्यातील ९० टक्के जलाशये संपली आहेत. या जलाशयांचे सिंचन मालकांपुरतेच राहीले आहे. त्यातील मासेमारीही मालकांपुरतीच होती. मात्र कुटुंब विस्तारत गेले आणि जलाशयाची जागा शेतीने घेतली आहे. माजी मालगुजारी जलाशये परिसरातील शेतीच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. खासगी तलाव संपण्याच्या मार्गावर असले तरीही इतर तलाव कसे वाचविता येतील या दृष्टीकोणातून प्रशासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे.जलाशय वाचविण्यासाठी अनेक वर्षापासून परिसरात राहणारे लोक, काम करणाऱ्यांचे ज्ञान वैज्ञानिक गोष्टी यांची सांगड घालून तलावाचे ‘रिस्टोरेशन’ आणि व्यवस्थापन आराखडा आणि अंमलबजावणी असे तीन टप्पे आहेत. परसवाडा आणि लोहारा या जलाशयावर येणाऱ्या पक्षी, वनस्पती आणि माशांच्या प्रजातीची यादी तयार केली. बाहेरचे मासे आणि स्थानिक मासे यांची यादी तयार केली. काय करावे, काय करु नये याची यादी तयार केली. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने काम सुरु केले. या दोन्ही गावातील भिंतीवर चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न केला. याचेच फलीत हे दोन्ही जलाशय संवर्धनासाठी मॉडेल म्हणून तयार झाले.सावन बहेकारवन्यजीव तज्ज्ञ तथा अध्यक्ष, सेवा संस्था.