शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

जिल्ह्याला ‘कृषी पर्यटना’चे वेध

By admin | Updated: December 19, 2015 01:43 IST

कित्येक वर्षांपासून धान आणि केवळ धान हे एकमेव पारंपरिक पिक घेत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ...

पीक प्रयोगांना सुरूवात : कारंजातील ‘फार्म’ विविध पिकांनी बहरतेयगोंदिया : कित्येक वर्षांपासून धान आणि केवळ धान हे एकमेव पारंपरिक पिक घेत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्यापुढे विविध पिकांचा पर्याय कृषी विभागाकडून ठेवला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात कोणकोणते पिक यशस्वीपणे घेतले जाऊ शकतात याचे प्रयोग कारंजा येथील कृषी विभागाच्या ३३ एकराच्या शेतावर सुरू आहेत. अत्याधुनिक शेती कशी करायची, याचे उत्तम उदाहरण ठरणारे हे प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत असून कृषी विभागाचे हे शेत ‘कृषी पर्यटना’चे केंद्र ठरत आहे.गोंदिया शहरालगत कारंजा ग्रामपंचायत हद्दीत येत असलेली ३३ एकर जागा कृषी विभागाच्या ताब्यात आहे. अनेक वर्षेपर्यंत या जागेचा योग्य वापरच होत नव्हता. मात्र गेल्या काही वर्षात कृषी विभागाने या जागेवर विविध पिकांचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी हे शेत म्हणजे केवळ पिकांचे प्रयोग करण्याचे ठिकाण न ठेवता शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे ठिकाण व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यांना योग्य ती साथ देऊन त्यावर मेहनत घेण्याचे काम उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांन केले. त्यातूनच आज या शेतात डाळींबाची बाग फुलली आहे. ऊसाचे पिक बहरले आहे. सीताफळ आणि मोठ्या बोरांची बाग वाढत आहे. पपईची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत सुरू आहे. केवळ हेच नाही तर मत्स्त्यपालनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र तळे बनविण्यात आले आहे. हौसी पर्यटकांना या तळ्यात आकड्याने मासोळ्या पकडण्याची संधी भविष्यात मिळू शकते.गोंदिया जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि हवामान पाहता या जिल्ह्यात धानासोबत ऊस, पेरू, आंबा ही पिके प्राधान्याने घेतली जाऊ शकतात. पण डाळींबासारखे मोठे उत्पन्न देणारे पिक यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल म्हणून या शेतावर डाळींबाची ५०० झाडं लावणात आली. अवघ्या वर्षभरात ही झाडं चांगली वाढून त्याला डाळींब लागण्यास सुरूवात झाली आहे. वर्षभरापूर्वी लावलेली आंब्याची ९०० झाडे चांगली बहरली आहेत. सीताफळाची ४०० झाडे, बोराची ७५ झाडे, तसेच २.१५ एकरात ऊस लागवड केली आहे. मिरची, ज्वारीचा हुरडा, एवढेच नाही तर छोट्या तलावात शिंगाड्याचेही उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ठिबक सिंचनातून कमी पावसात उन्हाळी धान घेतला जाऊ शकतो याचा यशस्वी प्रयोग येथे करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)