शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

जून, जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. जवळपास १ लाख हेक्टरवरील रोवणीची कामे अद्यापही खोळंबली आहेत. पावसाअभावी रोवणी वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात शनिवारी (दि.८) सकाळपासूनच काही भागात पावसाचा जोर कायम होता.

ठळक मुद्देदेवरी-आमगावचा संपर्क तुटला : देवरी, गोरेगाव, सडक अर्जुनी तालुक्यात दमदार पाऊस, रोवणीच्या कामाला येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गेल्या २४ तासात देवरी, गोरेगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही नाल्यांवर पाणी असल्याने तीन मार्ग बंद आहेत. तर काही घरात सुध्दा पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. या तिन्ही तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जून, जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. जवळपास १ लाख हेक्टरवरील रोवणीची कामे अद्यापही खोळंबली आहेत. पावसाअभावी रोवणी वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात शनिवारी (दि.८) सकाळपासूनच काही भागात पावसाचा जोर कायम होता. रात्रभर पावसाची रिपरिप कायम होती. रविवारी (दि.९) दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धानपिकांना संजीवनी मिळाली आहे. देवरी, गोरेगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील नदी नाले भरुन वाहत होते. आमगाव-देवरी मार्गावरील बोरगाव जवळील नाल्यावर पाणी असल्याने हा मार्ग बंद झाल्याने देवरी-आमगावचा संपर्क तुटला होता. तर सडक अर्जुनी तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी नाल्यावर पाणी असल्याने मुरदोली कोसमतोंडी आणि पांढरीचा संपर्क तुटला होता. गोरेगाव शहरातील वॉर्ड क्रमांक मध्ये रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सडक अर्जुनी शहरातील काही भागात पाणी साचल्याने समस्या निर्माण झाली होती. दमदार पावसामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया, सालेकसा तालुक्याला अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गोरेगाव आणि सडक अर्जुनी शहरातील काही नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी साचल्याने नगर पंचायत अनागोंदी कारभार देखील पुढे आला. त्यामुळे शहरवासीयांनी यासर्व प्रकारावर संताप व्यक्त करुन याकडे लक्ष देण्याची मागणी केली.या महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात गेल्या २४ तासात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात गोरेगाव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळात ११२.६० मिमी, देवरी तालुक्यातील देवरी ८५ मिमी, चिचगड महसूल मंडळात ८५ मिमी, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ७०.६० मिमी, डव्वा ७१.६० मिमी,सडक अर्जुनी ७०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.शेतातील पाणी रस्त्यांवरसडक अर्जुनी : सडक अर्जुनी ते कोहमारा मार्गावर शेतातील पाणी रस्त्यावर आल्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रविवारी (दि.९) पहाटे पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. नदी, नाले दुथडी भरुन वाहत होते. कोयलारी ते पुतडी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग काही वेळासाठी बंद झाला होता. पांढरी ते कोसमतोंडी मार्गावरील नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने हा मार्ग सुध्दा काही वेळ बंद झाला होता. सडक अर्जुनी जवळून वाहणाऱ्या उमरझरी नाल्या देखील भरुन वाहत होता. कोहमारा येथील काही घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. स्थानिक ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत धोरणाचा फटका या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला.रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरातगोरेगाव : गोरेगाव येथे शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी दुसऱ्या दिवशी सुध्दा कायम होता. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पाणी गोरेगाव शहरातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. येथील वार्ड क्र .१३ येथील रहिवासी संजय दिघोरे, युगुल किरसान आणि दिलीप चव्हाण यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यानंतर येथील नागरिकांनी तीन तास श्रमदान बंधारा तयार करुन पाण्याचा फ्लो कमी केला. जगत महाविद्यालयाकडील पाणी अडवून त्या पाण्याला दुसऱ्या दिशेला वळविण्यात आले.नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी नगर पंचायत सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करण्याचे आदेश देत पाण्याचा निचरा करण्यास सांगितले.घरात शिरले पाणीपांढरी : डुंडा येथील ग्रामपंचायतने नालीतील गाळाचा उपसा न केल्याने व ज्या ठिकाणी नालीचे खोदकाम करणे गरजेचे होते. त्या ठिकाणी कमी प्रमाणात उपसा केल्यामुळे रविवारी आलेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्यामुळे त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. या प्रकारावर गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर